शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

CoronaVirus News: अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ‘केडीएमसी’त जास्त; सर्वाधिक मृत्यू ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:11 IST

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागण्यास सुरुवात झाली. त्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने आजघडीला जिल्ह्यातील बाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकीकडे वाढ होत असताना दुसरीकडे या आजारावर यशस्वी मात करून स्वगृही परतणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. असे असताना सध्या जिल्ह्यात कल्याण डोंबिवलीत उपचार घेणाºया रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९९ हजार १५८ वर पोहोचली आहे. त्यापैकी केवळ १५ हजार ३२९ रुग्ण उपचारार्थ दाखल असून, यामध्ये सर्वाधिक कल्याण डोंबिवलीतील सर्वाधिक चार हजार ३२९ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागण्यास सुरुवात झाली. त्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने आजघडीला जिल्ह्यातील बाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर आहे. असे असले तरी या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ९९ हजार १५८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था कोरोनाची लागण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. या उपाययोजनांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ८१ हजार ५२ रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून स्वगृही परतले आहेत. तसेच भिवंडी, उल्हासनगर यासारख्या कोरोनाबाधित शहरांमधील रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात येत असली तरी नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत मात्र हा आकडा अजूनही म्हणावा त्या प्रमाणात कमी झालेला नाही.रुग्ण कमी होईनाजिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर असलेल्या ठाणे महापालिकेला मागे टाकून कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक चार हजार ३२९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात तीन हजार ४७० रुग्ण उपचार घेत आहेत.ठाणे पालिका क्षेत्रात २८५७ रुग्ण उपचार घेत आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये १६२८, ठाणे ग्रामीणमध्ये १४८२, उल्हासनगमध्ये ६२९, अंबरनाथमध्ये ३७८, बदलापूरमध्ये ३३७ आणि भिवंडीत केवळ २१९ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या