शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

CoronaVirus News: अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ‘केडीएमसी’त जास्त; सर्वाधिक मृत्यू ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:11 IST

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागण्यास सुरुवात झाली. त्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने आजघडीला जिल्ह्यातील बाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकीकडे वाढ होत असताना दुसरीकडे या आजारावर यशस्वी मात करून स्वगृही परतणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. असे असताना सध्या जिल्ह्यात कल्याण डोंबिवलीत उपचार घेणाºया रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९९ हजार १५८ वर पोहोचली आहे. त्यापैकी केवळ १५ हजार ३२९ रुग्ण उपचारार्थ दाखल असून, यामध्ये सर्वाधिक कल्याण डोंबिवलीतील सर्वाधिक चार हजार ३२९ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागण्यास सुरुवात झाली. त्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने आजघडीला जिल्ह्यातील बाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर आहे. असे असले तरी या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ९९ हजार १५८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था कोरोनाची लागण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. या उपाययोजनांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ८१ हजार ५२ रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून स्वगृही परतले आहेत. तसेच भिवंडी, उल्हासनगर यासारख्या कोरोनाबाधित शहरांमधील रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात येत असली तरी नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत मात्र हा आकडा अजूनही म्हणावा त्या प्रमाणात कमी झालेला नाही.रुग्ण कमी होईनाजिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर असलेल्या ठाणे महापालिकेला मागे टाकून कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक चार हजार ३२९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात तीन हजार ४७० रुग्ण उपचार घेत आहेत.ठाणे पालिका क्षेत्रात २८५७ रुग्ण उपचार घेत आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये १६२८, ठाणे ग्रामीणमध्ये १४८२, उल्हासनगमध्ये ६२९, अंबरनाथमध्ये ३७८, बदलापूरमध्ये ३३७ आणि भिवंडीत केवळ २१९ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या