शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊन झाल्यास उद्योग परराज्यात जातील; ‘आमा’च्या अध्यक्षांची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:23 IST

गेल्यावर्षीची भरपाई झालेली नाही, नियमांचे होत आहे पालन

- पंकज पाटीलअंबरनाथ : कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय योग्य ठरणार नाही. गेल्यावर्षी केलेल्या लॉकडाऊनमध्ये जे नुकसान झाले आहे त्याचीच भरपाई अद्याप कारखानदारांची झालेली नाही. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाल्यास अंबरनाथचे नव्हे तर महाराष्ट्रातील उद्योग हे परराज्यात निघून जातील आणि महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात मागे पडेल असे मत अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी व्यक्त केले.अंबरनाथमध्ये जे कारखानदार आहेत त्या कारखान्यात कामगार सर्व नियम आणि अटींचे पालन करीत आहेत. कारखान्यांमध्ये काम करत असताना कोरोनाचे लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातच कारखानदार आपल्या कारखान्यात सुरक्षेची यंत्रणा वापरात असल्याने आणि कामगारांची पूर्ण काळजी घेत असल्याने उद्योग किंवा कारखानदारी क्षेत्रात कोरोनाचा प्रसार होण्याचे प्रमाण अल्पच राहणार आहे. मात्र राज्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहता राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याच्या भूमिकेत दिसत असल्याने ही भूमिका कारखानदारांनासाठी घातक ठरू शकेल, असे मत तायडे यांनी व्यक्त केले. गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अंबरनाथमधील उद्योग पूर्णपणे ठप्प झाले होते, असे असतानादेखील सरकारने कोणतीही मदत कारखानदारांना केली नाही. एवढेच नव्हे तर कारखानदारांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजही कमी केले नाही. त्यामुळे कारखानदारांना त्यांचा भुर्दंड सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर पाण्याचे आणि विजेच्या बिलांची थकबाकीही व्याजासह वसूल करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच कारखानदारांनमध्ये संतापाचे वातावरण असताना पुन्हा लॉकडाऊन करणे म्हणजे अंबरनाथला आणि सोबतच महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात मागे नेण्याचा प्रकार म्हणता येईल.अंबरनाथमध्ये लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्याऐवजी कारखान्यात काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांना संघटनेच्या माध्यमातून लसीकरणाची मुभा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कोरोनाची लस संघटनेला पुरविल्यास संघटना स्वखर्चाने कामगारांना लस देऊन कोरोनाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकते. थेट लॉकडाऊन करण्यापेक्षा लसीकरणाच्या मोहिमेवर भर देण्याची गरज आहे. लसीकरणाची क्षमता वाढविल्यास लॉकडाऊनची गरज पडणार नाही आणि कामगारही सुरक्षित राहील.कामगार गावी निघून जातीलदुसरीकडे लॉकडाऊन होणार म्हटले तर अनेक उत्तर भारतीय कामगार आपल्या गावी निघून जातील आणि उद्योग आणि कारखानदारी क्षेत्रात काम करणारे कामगार शिल्लक राहणार नाहीत. प्रत्येक कामगार स्वतःची सुरक्षा घेऊन काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे केवळ लॉकडाऊन हा कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या पर्याय होऊ शकत नाही.     - उमेश तायडे, अध्यक्ष,     आमा संघटना