शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

Coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हॉटेल-बार बंदची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 01:29 IST

शहरांत ठिकठिकाणी सुरू असलेल्या बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढती आहे. त्यांच्या या संपर्कामुळे हा संसर्ग होण्याची संभाव्यता लक्षात घेत ते बंद करण्याची मागणी होत आहे.

ठाणे : मुंबईस लागून असलेल्या ठाणे शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यावरील उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनासह डॉक्टरांकडून सर्वपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरांत ठिकठिकाणी सुरू असलेल्या बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्यावाढती आहे. त्यांच्या या संपर्कामुळे हा संसर्ग होण्याची संभाव्यता लक्षात घेत ते बंद करण्याची मागणी होत आहे.सामाजिक जबाबदारीचे भान राखून गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने आधीच केले आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील कार्यक्रम थांबवले आहेत. गुढीपाडव्याच्या मिरवणुकाही आयोजकांनी रद्द केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर मंदिरांमधील भक्तांची गर्दी टाळण्यासाठी संबंधित व्यवस्थापकांनी मंदिरेदेखील बंद ठेवण्याचे नियोजन केले. या उपाययोजनांच्या दृष्टीने बार, रेस्टॉरंट, हॉटेलमधील ग्राहकांची गर्दी रोखण्यासाठी ते काही दिवस बंद करण्याच्या दृष्टीने सामाजिक संघटना पुढे येण्याच्या प्रयत्नात आहेत.कोरोनाचा संसर्ग झालेल्याची संख्या सातवर गेली आहे. डॉक्टरांच्या निगराणीतील या रुग्णांना मासिक आधार देऊन या संकटातून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.कोरोनाच्या या संकटाला राष्टÑीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापनाचा कायदा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लागू केला आहे.दूरध्वनीद्वारे मार्गदर्शननागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात सिव्हिल रुग्णालयातील परिचारिका नागरिकांच्या दूरध्वनींना उत्तरे देत आहेत. आतापर्यंत चार दूरध्वनी येऊन त्यांनी त्यांच्या इमारतीमध्ये परदेशातून आलेल्या मात्र दरवाजा बंद करून राहत असलेल्यांची माहिती दिल्याचे परिचारिकांनी सांगितले. तर उपाययोजनेच्या मार्गदर्शनासाठी जिल्ह्याभरातून फोन येत असल्याचेही सांगितले जात आहे. बार रेस्टॉरंट आणि हॉटेलमधील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने ते बंद करण्याची मागणी जोर धरत आहे, यावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.हॉटेल, बार, रेस्टॉरंट बंद केल्यास सकाळी घर सोडलेल्यांच्या खाण्यापिण्याचे वांधे होतील; पण ठिकठिकाणच्या रेस्टॉरंटमधील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने ट्रॉन्सपोर्ट बंद करावे लागेल. यामुळे नागरिक अन्य शहरात जाणे टाळतील आणि रेस्टॉरंटमधील गर्दी कमी होईल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhotelहॉटेल