शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus: खलाशांना उतरण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:44 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : खलाशांच्या कुटुंबीयांमध्ये आनंद

बोर्डी : पाच दिवसांपासून डहाणू बंदरात उतरण्याची वाट पाहणाऱ्या खलाशांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला असून शुक्रवारी त्यांना उतरविले जाणार आहे. हा प्रश्न ‘लोकमत’ने मांडल्यानंतर या वृत्ताची दखल पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांनी घेतली. या निर्णयामुळे खलाशी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.गुजरात बंदरातून पालघर जिल्ह्यातील खलाशी मागील पाच दिवसांपासून डहाणू खाडी येथे उतरण्यासाठी प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत तालुक्याच्या समुद्रहद्दीत बोटी नांगरून आहेत. मात्र त्यांना उतरविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी नसल्याने स्थानिक प्रशासनाकडून खलाशांना उतरविले जात नव्हते. त्यांच्या जवळचा जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपल्यानंतर, मासेमारी करणाºयासाठी आलेल्या स्थानिकांना विनंती केल्याने त्यांनी पुरवठा केला. दुसरीकडे कुटुंबीय घरी परतण्याची आतुरतेने वाट पाहत असताना पुन्हा गुजरात बंदरात माघारी परतण्याची वेळ त्यांच्यावर ओढवणार होती.उंबरगाव बंदरात स्वजिल्ह्यातील खलाशांसह घडलेल्या दुर्दैवी घटनेची ही पुनरावृत्ती असल्याची खलाशांची संतप्त भावना ‘लोकमत’ने बातमीतून मांडली. त्याची दखल खासदार राजेंद्र गावित, पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली असून कमिशनर शिवाजीराव दौंड यांनी जिल्हा प्रशासनाला खलाशांना शुक्रवारी बंदरात उतरविण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.शिवसेना पक्ष हा नेहमीच मच्छीमारांच्या हिताचा विचार करणारा पक्ष असून पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांनी परराज्यात रोजगारासाठी गेलेल्या खलाशी कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.- वैभव संखे, पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या