शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

CoronaVirus: खलाशांना उतरण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:44 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : खलाशांच्या कुटुंबीयांमध्ये आनंद

बोर्डी : पाच दिवसांपासून डहाणू बंदरात उतरण्याची वाट पाहणाऱ्या खलाशांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला असून शुक्रवारी त्यांना उतरविले जाणार आहे. हा प्रश्न ‘लोकमत’ने मांडल्यानंतर या वृत्ताची दखल पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांनी घेतली. या निर्णयामुळे खलाशी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.गुजरात बंदरातून पालघर जिल्ह्यातील खलाशी मागील पाच दिवसांपासून डहाणू खाडी येथे उतरण्यासाठी प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत तालुक्याच्या समुद्रहद्दीत बोटी नांगरून आहेत. मात्र त्यांना उतरविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी नसल्याने स्थानिक प्रशासनाकडून खलाशांना उतरविले जात नव्हते. त्यांच्या जवळचा जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपल्यानंतर, मासेमारी करणाºयासाठी आलेल्या स्थानिकांना विनंती केल्याने त्यांनी पुरवठा केला. दुसरीकडे कुटुंबीय घरी परतण्याची आतुरतेने वाट पाहत असताना पुन्हा गुजरात बंदरात माघारी परतण्याची वेळ त्यांच्यावर ओढवणार होती.उंबरगाव बंदरात स्वजिल्ह्यातील खलाशांसह घडलेल्या दुर्दैवी घटनेची ही पुनरावृत्ती असल्याची खलाशांची संतप्त भावना ‘लोकमत’ने बातमीतून मांडली. त्याची दखल खासदार राजेंद्र गावित, पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली असून कमिशनर शिवाजीराव दौंड यांनी जिल्हा प्रशासनाला खलाशांना शुक्रवारी बंदरात उतरविण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.शिवसेना पक्ष हा नेहमीच मच्छीमारांच्या हिताचा विचार करणारा पक्ष असून पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांनी परराज्यात रोजगारासाठी गेलेल्या खलाशी कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.- वैभव संखे, पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या