शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : एपीएमसीतील उलाढाल ५० लाखांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 01:44 IST

कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) दैनंदिन उलाढालीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : कोरोनाचा फटका सर्व घटकांना बसू लागला आहे. कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) दैनंदिन उलाढालीवरही त्याचा परिणाम झाला आहे. एरव्ही या समितीत पावणेदोन कोटी रुपयांची होणारी उलाढाल ही चार दिवसांपासून सुमारे ५० लाखांनी घटल्याची माहिती समितीचे सभापती कपिल थळे यांनी दिली.थळे म्हणाले की, दिवसाला राज्यातील पुणे, नाशिक, अहमदनगर तसेच इंदोर, शिमला, गुजरात, कर्नाटक आदी परराज्यांमधूनही भाजी येते. साधारणपणे दिवसाला १७० ते २०० ट्रक भाजीपाला, फळे, असा माल येतोे; पण आता काही दिवसांपासून सुमारे १२५ ट्रक एवढाच माल येत आहे. भाजीपाला-फळांना मागणी घटली आहे, तसेच कोरोनामुळे ग्राहकही बाजारात येत नसल्याने साधारणपणे १५ ते २० टक्क्यांची घट झाली. त्यामुळे उलाढाल घटली आहे. येत्या काळात अशी स्थिती राहिली तर मात्र परिस्थिती कठीण होईल, अशी शक्यता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. गर्दी टाळण्याच्या सूचना देताना स्वच्छता ठेवा, मास्कचा वापर करा, असे सांगितले आहे. त्यामुळे बाजारात गर्दी कमी होऊ लागली आहे. भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनचालकांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन समितीने केले असून, त्याला वाहनचालक व शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.उष्णतेमुळेहीपरिणामाची शक्यतामागील दोन दिवसांपासून उष्णता वाढू लागली आहे. भाजीपाल्याच्या आवकवर त्याचा किती परिणाम होतो, हे लवकरच स्पष्ट होईल. तूर्तास तरी कोरोनाचा फटका बसला आहे. पुढील काळात राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार नियमांची, आदेशाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीkalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस