शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

Coronavirus : एपीएमसीतील उलाढाल ५० लाखांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 01:44 IST

कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) दैनंदिन उलाढालीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : कोरोनाचा फटका सर्व घटकांना बसू लागला आहे. कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) दैनंदिन उलाढालीवरही त्याचा परिणाम झाला आहे. एरव्ही या समितीत पावणेदोन कोटी रुपयांची होणारी उलाढाल ही चार दिवसांपासून सुमारे ५० लाखांनी घटल्याची माहिती समितीचे सभापती कपिल थळे यांनी दिली.थळे म्हणाले की, दिवसाला राज्यातील पुणे, नाशिक, अहमदनगर तसेच इंदोर, शिमला, गुजरात, कर्नाटक आदी परराज्यांमधूनही भाजी येते. साधारणपणे दिवसाला १७० ते २०० ट्रक भाजीपाला, फळे, असा माल येतोे; पण आता काही दिवसांपासून सुमारे १२५ ट्रक एवढाच माल येत आहे. भाजीपाला-फळांना मागणी घटली आहे, तसेच कोरोनामुळे ग्राहकही बाजारात येत नसल्याने साधारणपणे १५ ते २० टक्क्यांची घट झाली. त्यामुळे उलाढाल घटली आहे. येत्या काळात अशी स्थिती राहिली तर मात्र परिस्थिती कठीण होईल, अशी शक्यता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. गर्दी टाळण्याच्या सूचना देताना स्वच्छता ठेवा, मास्कचा वापर करा, असे सांगितले आहे. त्यामुळे बाजारात गर्दी कमी होऊ लागली आहे. भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनचालकांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन समितीने केले असून, त्याला वाहनचालक व शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.उष्णतेमुळेहीपरिणामाची शक्यतामागील दोन दिवसांपासून उष्णता वाढू लागली आहे. भाजीपाल्याच्या आवकवर त्याचा किती परिणाम होतो, हे लवकरच स्पष्ट होईल. तूर्तास तरी कोरोनाचा फटका बसला आहे. पुढील काळात राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार नियमांची, आदेशाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीkalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस