शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Coronavirus : एपीएमसीतील उलाढाल ५० लाखांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 01:44 IST

कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) दैनंदिन उलाढालीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : कोरोनाचा फटका सर्व घटकांना बसू लागला आहे. कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) दैनंदिन उलाढालीवरही त्याचा परिणाम झाला आहे. एरव्ही या समितीत पावणेदोन कोटी रुपयांची होणारी उलाढाल ही चार दिवसांपासून सुमारे ५० लाखांनी घटल्याची माहिती समितीचे सभापती कपिल थळे यांनी दिली.थळे म्हणाले की, दिवसाला राज्यातील पुणे, नाशिक, अहमदनगर तसेच इंदोर, शिमला, गुजरात, कर्नाटक आदी परराज्यांमधूनही भाजी येते. साधारणपणे दिवसाला १७० ते २०० ट्रक भाजीपाला, फळे, असा माल येतोे; पण आता काही दिवसांपासून सुमारे १२५ ट्रक एवढाच माल येत आहे. भाजीपाला-फळांना मागणी घटली आहे, तसेच कोरोनामुळे ग्राहकही बाजारात येत नसल्याने साधारणपणे १५ ते २० टक्क्यांची घट झाली. त्यामुळे उलाढाल घटली आहे. येत्या काळात अशी स्थिती राहिली तर मात्र परिस्थिती कठीण होईल, अशी शक्यता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. गर्दी टाळण्याच्या सूचना देताना स्वच्छता ठेवा, मास्कचा वापर करा, असे सांगितले आहे. त्यामुळे बाजारात गर्दी कमी होऊ लागली आहे. भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनचालकांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन समितीने केले असून, त्याला वाहनचालक व शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.उष्णतेमुळेहीपरिणामाची शक्यतामागील दोन दिवसांपासून उष्णता वाढू लागली आहे. भाजीपाल्याच्या आवकवर त्याचा किती परिणाम होतो, हे लवकरच स्पष्ट होईल. तूर्तास तरी कोरोनाचा फटका बसला आहे. पुढील काळात राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार नियमांची, आदेशाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीkalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस