शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ३२ कोरोनाबाधितांनी जिंकली लढाई; बरे झालेल्यांमुळे आशादायक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 00:33 IST

हिमतीने केली आजारावर मात; वसई-विरार महापालिकेतील अनेक क्षेत्रे प्रतिबंधित

विरार : वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळत असून ही संख्या शंभरापार गेली असल्याने एकीकडे चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे मात्र परिसरातील ३२ जणांनी कोरोनावर मात केल्याने आशादायक चित्रही निर्माण झालेले आहे. कोरोना आजारातून बरे होता येते, त्यासाठी जिद्द हवी आणि योग्य ती काळजी घ्यायला हवी.कोरोनाबाधितांचा आकडा गुरुवारीच १०१ वर गेल्यामुळे आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात चिंता निर्माण झाली आहे. आतापर्यंत वसई-विरार परिसरातच ७ जणांना या आजारामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. मात्र त्याच वेळी वसई, नालासोपारा आणि विरार येथील ३२ रुग्णांनी हिमतीने या आजारावर मात करीत इतरांनाही आजाराशी लढण्याचे बळ दिले आहे.पालघर जिल्ह्यातील या सर्व रुग्णांमधून आतापर्यंत ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पालघरसह वसई-विरार महानगरपालिकेतील अनेक ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत.वसई-विरार परिसरात सुरुवातीपासूनच नागरिकांनी हलगर्जीपणा केल्याचा फटका येथील नागरिकांना बसला आहे. परदेशातून आलेले आणि ‘होम क्वारंटाइन’ केलेले अनेक तरुण बिनधास्तपणे बाहेर फिरत असल्याचेही आढळून आले होते. तसेच वसई, नालासोपारा आणि विरार परिसरात राहणारे अनेक लोक मुंबईमध्ये कामाला जात असल्यामुळे तेथून अनेकांना या जीवघेण्या विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता अनेक रुग्ण या लढाईत कोरोनावर मात करताना दिसत असून हे चित्र दिलासादायक आहे.कोरोनाच्या संसर्गाबाबत आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ३३५३ लोक देखरेखीखाली आहेत.१४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले १२३२ जण आहेत. लक्षणे आढळलेले २९ जण आहेत. कोरोनाबाधितांच्या सहवासात आलेले दोन हजार २२६ लोक असून जिल्ह्यात एकूण ११६ रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आलेली आहे.राजोडी गावकऱ्यांचा सतर्कतेने कोरोनाशी यशस्वीपणे लढापारोळ : महाराष्ट्र तसेच मुंबईत वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या हा चिंतेचा विषय झाला असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले, तर आपण कोरोनाविरोधातील लढाई यशस्वीपणे जिंकू शकतो, हे वसई तालुक्यातील राजोडीकरांनी दाखवून दिले. या गावात कोरोनाचे तीन रुग्ण मिळाल्यानंतरही गावकºयांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे तसेच नियमांचे पालन केल्याने येथील रुग्णांमध्ये अधिक वाढ झालेली नाही.पंधरा दिवसांपूर्वी राजोडी गावातील तीन तरुण जहाजावरचे काम संपवून अमेरिकेवरून सुटीवर आपल्या घरी आले. चौदा दिवस स्वत:च्या घरी क्वॉरन्टाईन राहण्याच्या अटीवर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर म्हणजेच दोन आठवड्यांनंतर या तिघांचीही वैद्यकीय तपासणी केल्यावर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण राजोडी गाव हादरून गेले. तीनही कोरोनाबाधित तरुणांसोबतच त्यांच्या संपर्कात आलेले त्यांचे आई-वडील यांनाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून क्वॉरन्टाईन करण्यात आले. अशा या गंभीर परिस्थितीमध्ये संपूर्ण गावातील गावकºयांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाबाधित रुग्ण, त्यांच्या कुटुंबांना मदत केली.गावकºयांच्या या सहकार्यामुळे रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सकारात्मक बळ मिळाले. यामुळेच दोन आठवड्याने फेरतपासणी केली असता, त्यांच्या आई -वडिलांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा या तिघा तरुणांची चाचणी करण्यात आली. त्यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांनाही घरी पाठवण्यात आले.गावकºयांनी सर्व नियमांचे योग्य पालन केल्याने हा रोग अधिक पसरला नाही. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे योग्य पालन केले तर राजोडीसारखी वसईही आपण कोरोनामुक्त करु शकतो, असे येथील ज्येष्ठ नागरिक चार्ली रोझारियो यांनी ‘लोकमत’ला सांगितले.कोरोना आजाराने ग्रासले म्हणजे सर्व संपले, असे वाटून अनेकजण हतबल होतात. मात्र, वसई-विरारमधील एकंदर ३२ जणांनी या आजारावर इच्छाशक्तीच्या जोरावर मात केली आहे. यामुळे या जीवघेण्या आजाराने बाधित झालेले अन्य रूग्णही अशाचप्रकारे लवकरात लवकर बरे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या