शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

coronavirus: ठाणे जिल्ह्यात बुधवारी झाली १४८७ कोरोना रुग्णांची वाढ, ३७ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 05:07 IST

जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक लाख २६ हजार ८३९, तर मृतांची संख्या आता तीन हजार ६१४ झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात एक हजार ४८७ रुग्णांसह ३७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक लाख २६ हजार ८३९, तर मृतांची संख्या आता तीन हजार ६१४ झाली आहे.यात कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक ४२९ रुग्णांसह १० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या २९ हजार ६४९, तर मृतांची संख्या ६४८ वर गेली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत २७३ बाधितांची, तर सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या २६ हजार ४०६, तर मृतांची संख्या ८५१ वर गेली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १९१ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात ३३ बाधितांसह दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या चार हजार २५२ झाली. तसेच उल्हासनगरात २४ रुग्ण सापडले असून दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये ४४ रुग्णांची, तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या पाच हजार ३७, तर मृतांची संख्या १९० झाली. बदलापूरमध्ये ५५ नवे रुग्ण वाढल्याने बाधितांची संख्या चार हजार २४३ इतकी झाली.वसई-विरारमध्ये १८३ नवे रुग्णवसई-विरार शहरात बुधवारी दिवसभरात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात १८३ नवे रुग्ण आढळून आले असून, १३८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती महापालिकेने दिली. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १७ हजार ०६९ वर पोहोचली आहे. तर शहरात एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १४ हजार ७९८ इतकी झाली आहे.नवी मुंबईत नऊ जणांचा मृत्यूनवी मुंबई : शहरात दिवसभरात उपचारादरम्यान ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा ६०४ वर पोहचला आहे. नवी मुंबई पालिकेने मृत्यूदर शुन्यावर आणण्याचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. आॅगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यात मृत्यूदर कमी करण्यात काही प्रमाणात यश आले. परंतु सद्यस्थितीमध्ये मृतांचा आकडा पुन्हा वाढला आहे.रायगडात २४ तासांत ६७० रुग्णांची नोंदअलिबाग : जिल्ह्यात बुधवारी (२ सप्टेंबर) ६७० नव्या कोरोना पॉझिटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. गेल्या पाच महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी वाढ असल्याने जिल्ह्यात कोरोना चांगलाच फोफावत असल्याचे दिसून येते. दिवसभरात १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बुधवारी अखेर बाधित रु ग्णांची संख्या २७ हजार ८६३ वर पोहोचली आहे. त्यापैकी २३ हजार ९२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे