शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

बेचव अन्नाच्या तक्रारींचे खापर कोरोना ‘लक्षणां’च्या माथी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:43 IST

रुग्णांना सकस, संतुलित आहार

- प्रशांत माने

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील कोरोनाच्या रुग्णांना दिले जात असलेले जेवण बेचव व निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रुग्ण व त्यांचे नातलग करीत आहेत. कोरोनात रुग्णांच्या तोंडाची चव जाणे आणि वास न येणे, यामुळे संबंधित तक्रारी केल्या जात असल्याचे केडीएमसीचे म्हणणे आहे. उलटपक्षी, रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने सकस, संतुलित शाकाहारी आहार दिला जात असून कुणी केलेल्या तक्रारींत तथ्य आढळले, तर भोजन पुरविणाऱ्याला योग्य त्या सूचना दिल्या जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

सध्या कल्याण-डोंबिवलीत सहा हजार ४३३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीयांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. केडीएमसीच्या कोविड आणि क्वारंटाइन सेंटरमधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना भोजन, न्याहारी आणि सीलबंद बाटलीतील पाणी पुरविले जात आहे.

भिवंडी येथील टाटा आमंत्रा, शहाड येथील साई निर्वाणा, कल्याणमधील होलीक्रॉस रुग्णालय, डोंबिवलीतील क्रीडासंकुल, शेलारनाका परिसरातील बीएसयूपी क्वारंटाइन सेंटर आणि डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय येथे सकाळी ८ वाजता नाश्ता, दुपारी ११.३० ते १ या कालावधीत भोजन, दुपारी ४ वाजता चहा आणि रात्री ८.३० ला पुन्हा भोजन दिले जाते. परंतु, अन्न बेचव, निकृष्ट असल्याच्या तक्रारी रुग्ण आणि नातेवाइकांकडून होत आहेत. या तक्रारींचे खापर प्रशासनाने कोरोनात उद्भवणाºया लक्षणांवर फोडले आहे. याआधी तक्रारी नव्हत्या. परंतु तोंडाची चव जाणे, वास न येणे, मळमळणे, पोट बिघडणे, अशी लक्षणे आढळून येत असल्याने तक्रारी वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

तेलकट, तिखट वर्ज्य

आरोग्याच्या दृष्टीने शाकाहारी संतुलित आहार दिला जातो. तेलकट, तिखट वर्ज्य केले जाते. त्यात मधुमेह आणि रक्तदाबविकार असलेले रुग्ण असल्याने त्याप्रमाणे आहार द्यावा लागतो. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला आहे. त्यामुळेही तक्रारी होत आहेत. परंतु, ज्या काही तक्रारी होतात, त्या किरकोळ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. महापालिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेले भोजनच रुग्णांना दिले जाते, याकडेही प्रशासनाने लक्ष वेधले आहे.