शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

बेचव अन्नाच्या तक्रारींचे खापर कोरोना ‘लक्षणां’च्या माथी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:43 IST

रुग्णांना सकस, संतुलित आहार

- प्रशांत माने

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील कोरोनाच्या रुग्णांना दिले जात असलेले जेवण बेचव व निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रुग्ण व त्यांचे नातलग करीत आहेत. कोरोनात रुग्णांच्या तोंडाची चव जाणे आणि वास न येणे, यामुळे संबंधित तक्रारी केल्या जात असल्याचे केडीएमसीचे म्हणणे आहे. उलटपक्षी, रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने सकस, संतुलित शाकाहारी आहार दिला जात असून कुणी केलेल्या तक्रारींत तथ्य आढळले, तर भोजन पुरविणाऱ्याला योग्य त्या सूचना दिल्या जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

सध्या कल्याण-डोंबिवलीत सहा हजार ४३३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीयांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. केडीएमसीच्या कोविड आणि क्वारंटाइन सेंटरमधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना भोजन, न्याहारी आणि सीलबंद बाटलीतील पाणी पुरविले जात आहे.

भिवंडी येथील टाटा आमंत्रा, शहाड येथील साई निर्वाणा, कल्याणमधील होलीक्रॉस रुग्णालय, डोंबिवलीतील क्रीडासंकुल, शेलारनाका परिसरातील बीएसयूपी क्वारंटाइन सेंटर आणि डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय येथे सकाळी ८ वाजता नाश्ता, दुपारी ११.३० ते १ या कालावधीत भोजन, दुपारी ४ वाजता चहा आणि रात्री ८.३० ला पुन्हा भोजन दिले जाते. परंतु, अन्न बेचव, निकृष्ट असल्याच्या तक्रारी रुग्ण आणि नातेवाइकांकडून होत आहेत. या तक्रारींचे खापर प्रशासनाने कोरोनात उद्भवणाºया लक्षणांवर फोडले आहे. याआधी तक्रारी नव्हत्या. परंतु तोंडाची चव जाणे, वास न येणे, मळमळणे, पोट बिघडणे, अशी लक्षणे आढळून येत असल्याने तक्रारी वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

तेलकट, तिखट वर्ज्य

आरोग्याच्या दृष्टीने शाकाहारी संतुलित आहार दिला जातो. तेलकट, तिखट वर्ज्य केले जाते. त्यात मधुमेह आणि रक्तदाबविकार असलेले रुग्ण असल्याने त्याप्रमाणे आहार द्यावा लागतो. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला आहे. त्यामुळेही तक्रारी होत आहेत. परंतु, ज्या काही तक्रारी होतात, त्या किरकोळ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. महापालिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेले भोजनच रुग्णांना दिले जाते, याकडेही प्रशासनाने लक्ष वेधले आहे.