शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

उल्हासनगरात कोरोना रुग्ण व डॉक्टरांना एकाच दर्जाचे जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 17:09 IST

दिवसाला एका रुग्णावर ३१८ रुपये जेवणासाठी खर्च केले असून, अग्निशमन दलाच्या जवानांसाठी तब्बल १२ हजार किमतीचा गमबूट खरेदी केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. 

उल्हासनगर : महापालिकेने डॉक्टर, कर्मचारी व कोरोना रुग्णांना एकाच दर्जाचे जेवण दिले असून, तीन महिन्यात जेवणावर तब्बल २ कोटींचा खर्च आला. तर पिण्याच्या बॉटल बंद पाण्यावर ५० लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. दिवसाला एका रुग्णावर ३१८ रुपये जेवणासाठी खर्च केले असून, अग्निशमन दलाच्या जवानांसाठी तब्बल १२ हजार किमतीचा गमबूट खरेदी केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. 

उल्हासनगर महापालिका स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या ऑनलाइन सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने सर्वच विषयाला मान्यता दिली. रुग्ण, डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्या जेवणावरील खर्च, अग्निशमन विभागाला लागणारे साहित्य खरेदी, बॉटल बंद पिण्याचे पाणी, जंतूनाशक औषध खरेदी आदी विषयाला सभेत मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी दिली. एकूण कोरोना रुग्ण, विलगीकरण कक्षात ठेवलेले संशयित रुग्ण, डॉक्टरसह इतर कर्मचारी यांना २३ मार्च ते १० जुलैपर्यंत देण्यात आलेल्या जेवण व पिण्याच्या पाण्यावर सव्वा कोटी व ३२ लाख खर्च आला. तसेच २३ मार्च ते १२ जूनदरम्यान जेवणाच्या थाळीत अंडी, फळे व दुधाची भर पडली.

महापालिकेने जेवणाबाबत रुग्ण, डॉक्टरसह इतर कर्मचारी यांच्यात कोणताही भेदभाव न करता एकाच दर्जाचे जेवण दिल्याची माहिती सहायक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिली. एका रुग्णाच्या जेवणावर दिवसाला ३१८ रुपये खर्च आल्याचे हिवरे म्हणाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रुग्णालय भेटीनंतर रुग्णांसह डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या जेवणात फळे, दूध व अंडी देण्यात येऊ लागली. १३ जून ते ११ जुलै दरम्यानच्या २८ दिवसांत जेवणावर ८० लाखांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला असून बॉटल बंद पिण्याच्या पाण्यावर १८ लाख रुपये खर्च झाला. यासर्व खर्चाला स्थायी समिती सभेत सोमवारी मान्यता देण्यात आली. एका जणाच्या जेवणावर ३१८ रुपये दिवसाला खर्च पालिकेने दाखवूनही मध्यंतरी डॉक्टर व रुग्णांनी निकृष्ट दर्जाचे जेवण असल्याचे आरोप करून त्यांनी महापालिकेवर धडक दिली होती. मात्र स्थायी समितीत एकमताने सर्वच खर्चाच्या विषयाला मान्यता देण्यात आल्याने वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. 

वस्तूच्या अवास्तव किमतीची सर्वत्र चर्चा

महापालिकेने निविदा न काढता अग्निशमन विभागासाठी ४५ लाखाच्या विविध वस्तूची खरेदी केली. यामध्ये अग्निशमन जवानांसाठी लागणारा एक गम बुट तब्बल १२ हजार पेक्षा जास्त किमतीला खरेदी केला. तसेच १ कोटी किमतीचे फवारणीसाठी लागणारे औषध व जंतुनाशक व घरोघरी जावून ऑक्सिजन तपासणीसाठी लागणारे एकूण १५०० थर्मल स्कॅनर मशीन खरेदी केले आहे. या सर्वांच्या किमतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.