शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णांची संख्या ४४२ने वाढली असून, ११ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णांची संख्या ४४२ने वाढली असून, ११ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३४ हजार ४५३ बाधित रुग्णांची, तर १० हजार ७४४ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

ठामपा हद्दीत दिवसभरात १०१ रुग्ण आढळले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या एक लाख ३३ हजार ७३१ झाली आहे, तर मृतांची संख्या दोन हजार २० नोंदवली गेली. केडीएमसी हद्दीत ७४ बाधित व दोन मृत्यू झाले आहेत. या मनपा हद्दीत एकूण एक लाख ३६ हजार‌ ७१९ बाधितांसह दोन हजार ६०० मृतांची नोंद झाली.

उल्हासनगरमध्ये ११ बाधित व तीन मृत्यू नोंदवले गेले. यासह शहरात एकूण २० हजार ८१८ बाधित, तर ५११ मृतांची नोंद झाली. भिवंडीत दोन बाधित सापडले. तर, एकाचाही मृत्यू झालेला नाही. यामुळे या शहरातील १० हजार ६२८ बाधितांसह ४५९ मृत्यू नोंद कायम आहेत. मीरा - भाईंदरला ३५ बाधित व एकाचा मृत्यू झाला. या शहरातील ५० हजार ८०० बाधित व एक हजार ३४२ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये ११ बाधित व एकही मृत्यू नाही. यामुळे आता येथील बाधितांची संख्या १९ हजार ७७५ व मृतांची संख्या ५१७ नोंदली आहे. बदलापूरमध्ये २० बाधित सापडले असून, आजवरचे बाधित २१ हजार १८३, तर मृत्यू ३४७ झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ४६ बाधित सापडले. पण एकही मृत्यू नाही. यामुळे या ग्रामीण क्षेत्रात आजपर्यंत ३९ हजार ५३५ बाधितांची व एक हजार १८५ मृतांची नोंद झाली आहे.

-----------