शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे ग्रामीण भागातून कोरोना कमी होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे ग्रामीण भागातून कोरोना कमी होऊ लागला आहे. अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत भागातून कोरोना हद्दपार होत आहे. शहापूर तालुक्यात ७ जूनपासून एकही रुग्ण नसलेल्या ग्रामपंचायती ७३ आहेत. मुरबाडमधील ५ आणि शहापूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नसल्याने या ग्रामपंचायतींनी कोरोनाचा वेशीवर अटकाव केल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाची दुसरी लाटही जिल्ह्यातून ओसरू लागली आहे. दुसऱ्या लाटेचा फटका शहरी भागासह ग्रामीण भागालाही बसला. मृत्यूचे प्रमाणही या भागांमध्ये अधिक होते. आता जिल्ह्यातील पाचही तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करु लागले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील २८ पैकी ७ ग्रामपंचायतींत मागील २८ दिवसांत एकही रुग्ण आढळलेला नाही. मागील ७ जूनपासून १२ ग्रामपंचायतीत एकही नवा रुग्ण नाही, तर दोन्ही लाटांमध्ये २ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. या तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. भिवंडीमधील १२१ पैकी ४४ ग्रामपंचायतींत २८ दिवसांत एकही नवा रुग्ण नाही, तर ७ जूनपासून ५६ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण नाही. दोन्ही लाटांमध्ये ६ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. या तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. कल्याण तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींपैकी ९ ग्रामपंचायतींत २८ दिवसांत एकही नवा रुग्ण नाही, तर ७ जूनपासून १९ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण नाही. दोन्ही लाटांमध्ये ३ ग्रामपंचायतीत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. मुरबाड तालुक्यातील १२६ ग्रामपंचायतींपैकी ६२ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण आढळला नाही, तर मागील ७ जूनपासून ९९ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण आढळला नाही. दोन्ही लाटांमध्ये ४४ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. पाच तालुक्यांत दोन्ही लाटांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही, तर या तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. कल्याण तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींत २८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही. ७ जूनपासून १९ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण आढळला नाही. दोन्ही लाटांमध्ये ३ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. मुरबाड तालुक्यातील १२६ पैकी ६२ ग्रामपंचायतींत २८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नसून, ७ जूनपासून ९९ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण नाही. दोन्ही लाटांमध्ये ४४ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. पाच ग्रामपंचायतीत दोन्ही लाटांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. या तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायतींत २८ दिवसांत एकही नवा रुग्ण मिळालेला नाही. ७ जूनपासून ७३ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण आढळला नाही. दोन्ही लाटांमध्ये येथील १५ ग्रामपंचायतींत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले नाहीत. या तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींत एकही मृत्यू झालेला नाही. एकूण पाच तालुक्यांतील ४३१ ग्रामपंचायतींपैकी १५७ ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. ७ जूनपासून २५९ ग्रामपंचायतींत एकही नवा रुग्ण नाही. दोन्ही लाटांमध्ये सहा ग्रामपंचायतींत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पाचपेक्षा कमी रुग्ण हे ७० ग्रामपंचायतींत आढळून आले आहेत. १७२ ग्रामपंचायतींत काही कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

आतापर्यंत झालेल्या चाचण्या - ७४८५९

बाधित होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - १०.५०

रुग्ण बरे होण्याचे होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - ९५ टक्के

एकूण रुग्ण - ३८२९५

बरे झालेले रुग्ण -३६५६८

उपचार सुरू असलेले रुग्ण - ६००

मृत्यू - ११२७

तालुका - ॲक्टिव्ह रुग्ण

अंबरनाथ -६५

कल्याण - १९५

भिवंडी - २३५

शहापूर - ७५

मुरबाड - ३०

अनलॉकनंतर कोणत्या तालुक्यात रुग्ण वाढले आणि कुठे कमी झाले

अनलॉकनंतर ठाणे जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत नव्याने रुग्ण वाढले नाही. सध्या तरी या पाचही तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात दिसत आहे.

कोरोना संपलेला नाही, मात्र नियंत्रणात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेतली जात असून, तालुकानिहाय टेस्टिंगचे टारगेट दिले जात आहे. ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याठिकाणी घरोघरी जाऊन अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

(डॉ. मनीष रेंगे - जिल्हा आरोग्य अधिकारी )