शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे जि.प.शाळांच्या सर्व्हेला ‘बाधा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एकीकडे कोरोनामुळे जिल्ह्यातील एकही शाळा अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही. दुसरीकडे जिल्ह्यात असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : एकीकडे कोरोनामुळे जिल्ह्यातील एकही शाळा अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही. दुसरीकडे जिल्ह्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा सर्व्हे मागील दोन वर्षांत याच कारणामुळे झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किती शाळा इमारतींसह किती वर्गखोल्या धोकादायक झाल्या आहेत. याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ३३० शाळा असून या शाळांमध्ये ७७ हजार ८९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु या शाळांमध्ये ९८ शौचालयाची, तीन हजार २२० वर्गखोल्यांमध्ये किचन शेड नसणे, ८९९ शाळांना संरक्षण भिंत आणि ६४६ शाळांना मैदान नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कोरोनामुळे यंदादेखील शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे त्यांना घरी बसूनच अभ्यास करावा लागत आहे, परंतु ग्रामीण भागात इंटरनेटची फारशी सुविधा नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कसाबसा अभ्यास करावा लागत आहे. दरम्यान, विद्यार्थी शाळेत जात नसताना अशा काळात सर्व्हे करून ज्या शाळांची अवस्था दयनीय झालेली आहे, अशा शाळांची दुरुस्ती करून त्या पुन्हा योग्य कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे असेल तरी जिल्हा परिषदेने अशा शाळांचा अद्यापही सर्व्हे केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे एकूण एक हजार ३३० पैकी किती शाळा, किती शाळांमधील वर्गखोल्यांची अवस्था दयनीय आहे किंवा किती वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या तब्बल ७७ हजार ८९२ विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या एकूण शाळांमधील ९८ शाळांमध्ये शौचालयच नाही. त्यामध्ये ६७ मुलींसाठी आणि ३१ मुलांसाठीच्या शौचालयांचा समावेश आहे. दुसरीकडे तीन हजार २२० वर्गखोल्यांमध्ये किचन शेड नसणे, ८९९ शाळांना संरक्षण भिंत आणि ६४६ शाळांना मैदान नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे,परंतु या शाळांमधील किती वर्गखोल्या किंवा शाळा इमारत धोकादायक किंवा किती शाळांची इमारत दुरुस्त करणे गरजेचे आहे याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

जिल्ह्यातील एकूण शाळा - १,३३०

एकूण विद्यार्थी - ७७,८९२

वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक - माहिती उपलब्ध नाही

कोणत्या तालुक्यात किती धोकादायक? -माहिती उपलब्ध नाही

तालुका शाळा

अंबरनाथ - ११४

भिवंडी - ३०८

कल्याण - १२०

मुरबाड - ३२९

शहापूर - ४५७