शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जिद्द निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जिद्द निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बहुतांशी सरपंच व ग्रामसेवकांशी ऑनलाइन संवाद साधत या स्पर्धेची माहिती दिली.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी कुटुंब सर्वेक्षण पथक तयार करणे, विलगीकरण कक्षाची स्थापना, कोरोना तपासणीसाठी रुग्णालयात नेणाऱ्या वाहनचालकांचे पथक, कोरोना हेल्पलाइन पथक, लसीकरण पथक आदी पंचसूत्रीनुसार गावात तयारी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या नियोजनाची जबाबदारी प्रामुख्याने सरपंच व ग्रामसेवक यांनी घेऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. या पंचसूत्रीनुसार काम केल्यास ग्रामपंचायतीला कोरोनामुक्त गाव स्पर्धेत हमखास यश मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

आझादी का अमृत महोत्सव उपक्रम राबवणार

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र शासनातर्फे सुरू असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रमही प्रत्येक ग्रामपंचायतीत उत्साहाने राबवावा. कोरोना नियंत्रण नियमांचे काटेकोरपणे पालन करून विविध कार्यक्रम ग्रामपंचायतस्तरावर घ्यावेत, असेही दांगडे म्हणाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी चंद्रकांत पवार यांनी या दोन्ही उपक्रमांची माहिती दिली.

----------------