शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जिद्द निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जिद्द निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बहुतांशी सरपंच व ग्रामसेवकांशी ऑनलाइन संवाद साधत या स्पर्धेची माहिती दिली.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी कुटुंब सर्वेक्षण पथक तयार करणे, विलगीकरण कक्षाची स्थापना, कोरोना तपासणीसाठी रुग्णालयात नेणाऱ्या वाहनचालकांचे पथक, कोरोना हेल्पलाइन पथक, लसीकरण पथक आदी पंचसूत्रीनुसार गावात तयारी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या नियोजनाची जबाबदारी प्रामुख्याने सरपंच व ग्रामसेवक यांनी घेऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. या पंचसूत्रीनुसार काम केल्यास ग्रामपंचायतीला कोरोनामुक्त गाव स्पर्धेत हमखास यश मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

आझादी का अमृत महोत्सव उपक्रम राबवणार

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र शासनातर्फे सुरू असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रमही प्रत्येक ग्रामपंचायतीत उत्साहाने राबवावा. कोरोना नियंत्रण नियमांचे काटेकोरपणे पालन करून विविध कार्यक्रम ग्रामपंचायतस्तरावर घ्यावेत, असेही दांगडे म्हणाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी चंद्रकांत पवार यांनी या दोन्ही उपक्रमांची माहिती दिली.

----------------