शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीमध्ये कोरोना तर गर्दी नसताना चोरट्यांची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सध्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील महिला, पुरुषांना रेल्वेप्रवासाची मुभा आहे. अशावेळी गर्दी असताना कोरोनाची तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सध्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील महिला, पुरुषांना रेल्वेप्रवासाची मुभा आहे. अशावेळी गर्दी असताना कोरोनाची तर गर्दी नसताना चोरट्यांची भीती वाटते. अनेकदा असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे रेल्वेने अधिक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

ठाणे महापालिकेच्या साकेत येथील ग्लोबल कोविड रुग्णालयातील परिचारिका किरण पाटील या वासिंद ते ठाणे असा रोज प्रवास करतात. त्या म्हणाल्या, सध्या कोरोनामुळे रेल्वेत तशी गर्दी कमी असते. अशावेळी चोरट्यांची किंवा छेडछाडीच्या प्रकाराचीही भीती असते. एक वर्षापूर्वी वासिंद आटगाव दरम्यान एका महिलेवर रेल्वेतच लैंगिक अत्याचार करून तिला आटगाव स्थानकाजवळ रेल्वेतून बाहेर फेकण्यात आले होते. टिटवाळ्यापर्यंत भीतीदायक वातावरण असते. ठाण्यातून जाताना कल्याणनंतर आरपीएफचे पोलीस कधी असतात, तर कधी कोणीच नसते. त्यामुळे अनेकदा असुरक्षिततेची भावना असते.

ठाणे ते मुलुंड दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या आणखी एक लॅब टेक्निशियन प्रीती सोलाट म्हणाल्या, अनेकदा रात्री ९ नंतर लेडिज डब्यात पोलीस असतात. पण, रात्री ११ नंतर महिलांच्या एका डब्यात पुरुषांनाही परवानगी असल्यामुळे प्रवासात असुरक्षितता वाटते. रेल्वेतून उतरल्यानंतर फलाटावर कोणीच नसेल तर आणखी भीती वाटते. त्यामुळे रेल्वेसह आणि रेल्वेस्थानक परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची गरज आहे. कळव्यात घडलेली घटना तर अंगावर शहारे आणणारी आहे. अशा आरोपींना कडक शासन झाले पाहिजे. मुळात, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असताना चोरटे रेल्वेत शिरतातच कसे, हा मोठा प्रश्न आहे, असेही त्या म्हणाल्या. तर ठाणे ते मुलुंड दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या उर्मिला कोपतरे या अन्य एक लॅब टेक्निशियन म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी आरपीएफने आमचे मोबाइल क्रमांक घेतले. काही आपत्ती ओढवल्यास मदतीसाठी ग्रुप केला होता. पुढे त्याचे काय झाले, हे कळलेच नाही. अनेकदा पिक अवरमध्ये प्रॉब्लेम नसतो. दुपारी आणि रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीची गरज आहे. सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्याची आवश्यकता आहे.

२० वर्षांत वाईट अनुभव कधीच नाही

गेल्या २० वर्षांपासून ठाणे ते कल्याण रेल्वेने प्रवास करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या चिरागनगर आरोग्य केंद्राच्या परिचारिका शोभा कमाने यांना मात्र रेल्वेप्रवासाचा चांगला अनुभव आहे. त्या म्हणाल्या, गेल्या २० वर्षांत या प्रवासात वाईट अनुभव आलेला नाही. अनेकदा फास्ट लोकलने प्रवास केला. लेडिज डब्यात पोलीसही असतात त्यामुळे सुरक्षित वाटते.