शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

गर्दीमध्ये कोरोना तर गर्दी नसताना चोरट्यांची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सध्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील महिला, पुरुषांना रेल्वेप्रवासाची मुभा आहे. अशावेळी गर्दी असताना कोरोनाची तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सध्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील महिला, पुरुषांना रेल्वेप्रवासाची मुभा आहे. अशावेळी गर्दी असताना कोरोनाची तर गर्दी नसताना चोरट्यांची भीती वाटते. अनेकदा असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे रेल्वेने अधिक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

ठाणे महापालिकेच्या साकेत येथील ग्लोबल कोविड रुग्णालयातील परिचारिका किरण पाटील या वासिंद ते ठाणे असा रोज प्रवास करतात. त्या म्हणाल्या, सध्या कोरोनामुळे रेल्वेत तशी गर्दी कमी असते. अशावेळी चोरट्यांची किंवा छेडछाडीच्या प्रकाराचीही भीती असते. एक वर्षापूर्वी वासिंद आटगाव दरम्यान एका महिलेवर रेल्वेतच लैंगिक अत्याचार करून तिला आटगाव स्थानकाजवळ रेल्वेतून बाहेर फेकण्यात आले होते. टिटवाळ्यापर्यंत भीतीदायक वातावरण असते. ठाण्यातून जाताना कल्याणनंतर आरपीएफचे पोलीस कधी असतात, तर कधी कोणीच नसते. त्यामुळे अनेकदा असुरक्षिततेची भावना असते.

ठाणे ते मुलुंड दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या आणखी एक लॅब टेक्निशियन प्रीती सोलाट म्हणाल्या, अनेकदा रात्री ९ नंतर लेडिज डब्यात पोलीस असतात. पण, रात्री ११ नंतर महिलांच्या एका डब्यात पुरुषांनाही परवानगी असल्यामुळे प्रवासात असुरक्षितता वाटते. रेल्वेतून उतरल्यानंतर फलाटावर कोणीच नसेल तर आणखी भीती वाटते. त्यामुळे रेल्वेसह आणि रेल्वेस्थानक परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची गरज आहे. कळव्यात घडलेली घटना तर अंगावर शहारे आणणारी आहे. अशा आरोपींना कडक शासन झाले पाहिजे. मुळात, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असताना चोरटे रेल्वेत शिरतातच कसे, हा मोठा प्रश्न आहे, असेही त्या म्हणाल्या. तर ठाणे ते मुलुंड दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या उर्मिला कोपतरे या अन्य एक लॅब टेक्निशियन म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी आरपीएफने आमचे मोबाइल क्रमांक घेतले. काही आपत्ती ओढवल्यास मदतीसाठी ग्रुप केला होता. पुढे त्याचे काय झाले, हे कळलेच नाही. अनेकदा पिक अवरमध्ये प्रॉब्लेम नसतो. दुपारी आणि रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीची गरज आहे. सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्याची आवश्यकता आहे.

२० वर्षांत वाईट अनुभव कधीच नाही

गेल्या २० वर्षांपासून ठाणे ते कल्याण रेल्वेने प्रवास करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या चिरागनगर आरोग्य केंद्राच्या परिचारिका शोभा कमाने यांना मात्र रेल्वेप्रवासाचा चांगला अनुभव आहे. त्या म्हणाल्या, गेल्या २० वर्षांत या प्रवासात वाईट अनुभव आलेला नाही. अनेकदा फास्ट लोकलने प्रवास केला. लेडिज डब्यात पोलीसही असतात त्यामुळे सुरक्षित वाटते.