शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

कोरोनामुळे यंदाही औषधवारीत पडला खंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

ठाणे : गेली ३८ वर्षे वारकऱ्यांची अखंड सेवा करण्यासाठी ठाण्यातून निघणाऱ्या औषधवारीत यंदाही खंड पडला आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या ...

ठाणे : गेली ३८ वर्षे वारकऱ्यांची अखंड सेवा करण्यासाठी ठाण्यातून निघणाऱ्या औषधवारीत यंदाही खंड पडला आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या दिवशी ती रद्द करावी लागली आहे. पुढच्या वर्षी मात्र वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळू दे, असे साकडे विठुरायाला घातले जाणार आहे.

“विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” असा विठुरायाचा जयघोष करून वारकरी दरवर्षी पंढरपूरला दर्शनासाठी जातात. त्यांच्या सेवेसाठी ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने व डॉ. ओमप्रकाश शुक्ल यांच्या पुढाकाराने १९८२ सालापासून ठाणे शहरातून औषधवारी निघते. परंतु, कोरोनामुळे सलग दोन वर्षे वारीमध्ये खंड पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही वर्षी मंडळाने औषधवारी रद्द केल्या आहेत. गेल्या वर्षी मुक्कामाचे ठिकाण निश्चित केलेले असताना औषधवारी रद्द करावी लागली होती. तसेच, या वर्षी नक्की औषधवारी असेल, असे वाटत असताना कोरोनाचे सावट टळले नसल्याने ती रद्द करावी लागली आहे.

१९८२ सालापासून ओमप्रकाश शुक्ल, अच्युत जोशी, गोविंद मुंदडा, डॉ आंबर्डेकर, डॉ. फडके या पाच जणांच्या टीमने सुरू केलेल्या औषधवारीत १९८८ सालापासून २५ जणांची टीम जाऊ लागली. यात ८ डॉक्टर्स, उत्तर वैद्यकीय कर्मचारी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असतो. नऊ महिने औषध गोळा करून झाल्यानंतर तीन महिने या औषधांचे वर्गीकरण मंडळाच्या सभागृहात दर रविवारी केले जाते. यंदा, मात्र या सर्व कामात खंड पडला आहे, असे डॉ. शुक्ल म्हणाले. सरकारचे धोरण अगदी योग्य आहे, या वर्षी पुन्हा एकदा औषधवारी रद्द झाली असली तरी पुढल्या वर्षी या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला दे, असे साकडे विठुरायाच्या चरणी घालणार असल्याचे ते म्हणाले.

-----------------------

औषधवारी रद्द झाली असली तरी गावातील वारकरी आठवणीने संपर्क करून तुम्ही आमची सेवा किंवा आमच्या आईवडिलांना औषधपाणी द्यायचे. आज त्या प्रसंगांची आठवण होत असल्याचे सांगतात.

-----------------------

या औषधवारीत सर्व प्रकारांची औषधे ठेवली जात. वारकऱ्यांना वारीदरम्यान प्रामुख्याने ताप, जुलाब उलटी, सांधेदुखी, पायाला गोळे येणे, चक्कर, मलेरिया, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यावर उपचार करण्यासाठी डॉ. शुक्ल आणि त्यांची टीम सज्ज असते.

-----------------------

फलटण - बरड - नातेपुते - माळशीरस - वेळापूर - वाडीपुरोळी - वाखरी या ठिकाणी मंडळाच्या वतीने शिबिर भरविले जाते.

-------