शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे यंदाही औषधवारीत पडला खंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

ठाणे : गेली ३८ वर्षे वारकऱ्यांची अखंड सेवा करण्यासाठी ठाण्यातून निघणाऱ्या औषधवारीत यंदाही खंड पडला आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या ...

ठाणे : गेली ३८ वर्षे वारकऱ्यांची अखंड सेवा करण्यासाठी ठाण्यातून निघणाऱ्या औषधवारीत यंदाही खंड पडला आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या दिवशी ती रद्द करावी लागली आहे. पुढच्या वर्षी मात्र वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळू दे, असे साकडे विठुरायाला घातले जाणार आहे.

“विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” असा विठुरायाचा जयघोष करून वारकरी दरवर्षी पंढरपूरला दर्शनासाठी जातात. त्यांच्या सेवेसाठी ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने व डॉ. ओमप्रकाश शुक्ल यांच्या पुढाकाराने १९८२ सालापासून ठाणे शहरातून औषधवारी निघते. परंतु, कोरोनामुळे सलग दोन वर्षे वारीमध्ये खंड पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही वर्षी मंडळाने औषधवारी रद्द केल्या आहेत. गेल्या वर्षी मुक्कामाचे ठिकाण निश्चित केलेले असताना औषधवारी रद्द करावी लागली होती. तसेच, या वर्षी नक्की औषधवारी असेल, असे वाटत असताना कोरोनाचे सावट टळले नसल्याने ती रद्द करावी लागली आहे.

१९८२ सालापासून ओमप्रकाश शुक्ल, अच्युत जोशी, गोविंद मुंदडा, डॉ आंबर्डेकर, डॉ. फडके या पाच जणांच्या टीमने सुरू केलेल्या औषधवारीत १९८८ सालापासून २५ जणांची टीम जाऊ लागली. यात ८ डॉक्टर्स, उत्तर वैद्यकीय कर्मचारी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असतो. नऊ महिने औषध गोळा करून झाल्यानंतर तीन महिने या औषधांचे वर्गीकरण मंडळाच्या सभागृहात दर रविवारी केले जाते. यंदा, मात्र या सर्व कामात खंड पडला आहे, असे डॉ. शुक्ल म्हणाले. सरकारचे धोरण अगदी योग्य आहे, या वर्षी पुन्हा एकदा औषधवारी रद्द झाली असली तरी पुढल्या वर्षी या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला दे, असे साकडे विठुरायाच्या चरणी घालणार असल्याचे ते म्हणाले.

-----------------------

औषधवारी रद्द झाली असली तरी गावातील वारकरी आठवणीने संपर्क करून तुम्ही आमची सेवा किंवा आमच्या आईवडिलांना औषधपाणी द्यायचे. आज त्या प्रसंगांची आठवण होत असल्याचे सांगतात.

-----------------------

या औषधवारीत सर्व प्रकारांची औषधे ठेवली जात. वारकऱ्यांना वारीदरम्यान प्रामुख्याने ताप, जुलाब उलटी, सांधेदुखी, पायाला गोळे येणे, चक्कर, मलेरिया, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यावर उपचार करण्यासाठी डॉ. शुक्ल आणि त्यांची टीम सज्ज असते.

-----------------------

फलटण - बरड - नातेपुते - माळशीरस - वेळापूर - वाडीपुरोळी - वाखरी या ठिकाणी मंडळाच्या वतीने शिबिर भरविले जाते.

-------