शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यात ४४ हजार १५२ कुटुंबांचा स्वयंपाक चुलीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करून काही अटींमध्ये सवलतही दिली आहे. कोणतीही अनामत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करून काही अटींमध्ये सवलतही दिली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्पउत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र, खरी अडचण नंतर गॅस भरण्याची आहे. गॅसच्या किमती वाढल्याने त्या अल्पउत्पन्न कुटुंबांना परवडत नाही. सद्यस्थितीला एका घरगुती सिलिंडरसाठी ८३५ एवढी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. यामुळे या अल्पउत्पन्न कुटुंबीयांना आता शक्य नाही. त्यामुळे या उज्ज्वला योजनेच्या जिल्ह्यातील ४४ हजार १५२ महिला लाभार्थी आजघडीला गॅसऐवजी चुलीकडे वळल्या असून त्यावरच स्वयंपाक सुरू आहे.

जिल्ह्यातील शहरी व आदिवासी, दुर्गम भागातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेद्वारे एलपीजी गॅसचे कनेक्शन मोफत देण्यात आले. त्यासोबत काही रक्कम घेऊन शेगडीही दिली. मात्र, दरमहा गॅस सिलिंडर मोफत देण्याचे नियोजन केले नाही. त्यामुळे दरमहा वाढणाऱ्या गॅसच्या किमती या कुटुंबीयांना परवडणाऱ्या नाहीत. या महागाईच्या डोकेदुखीतून सुटका करून घेत गरीब कुटुंबीय आता लाकडांचा वापर करून चुलींवर स्वयंपाक करीत आहेत. या कुटुंबीयांना रोजगार हमीच्या कामावर २३८ रुपये मजुरी मिळत आहे. त्यात घराचा खर्च करीत असतानाच या गॅस सिलिंडरसाठी ८३५ रुपये भरणे त्यांना शक्यच नाही. सिलिंडरच्या किमती दर महिन्याला त्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. सर्वच ठिकाणी जीवघेणी महागाई आता गरिबांच्या मुळावरच उठली आहे.

सध्याच्या या आर्थिक संकटात सापडलेले परिवार आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी तारेवरची कसरत करीत आहेत. यामुळेच जिल्ह्यातील उज्ज्वला योजनेच्या गॅस कनेक्शनच्या लाभार्थी ४४ हजार १५२ महिलांनी महागडे गॅस सिलिंडर घेण्याऐवजी पारंपरिक पद्धतीच्या चुलीवर स्वयंपाक करण्यास प्रारंभ केला आहे. गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या अनुदानाची रक्कमही सध्या मिळत नाही. बँक खात्यावर जमा होणारी अनुदानाची ही रक्कम आता बंद झाली आहे.

-------