शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

सोयीसुविधा तरी रहिवासी म्हणतात, आम्हाला हक्काच्या घरात जाऊ द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात पहाटे ५ च्या सुमारास वागळे इस्टेट भागातील डिसोझावाडी येथील तळ अधिक चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यात पहाटे ५ च्या सुमारास वागळे इस्टेट भागातील डिसोझावाडी येथील तळ अधिक चार मजल्याच्या रिकाम्या असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर या इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या सहा इमारती रिकाम्या करून येथील तब्बल १७४ कुटुंबांना बाजूच्या शाळेत स्थलांतरित केले आहे. या रहिवाशांना बाजूच्या अंबिका शाळा आणि एका हॉलमध्ये सध्या ठेवले आहे. या ठिकाणी आमदार, स्थानिक नगरसेवक, माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून सोयीसुविधा, जेवणाची व्यवस्था केली आहे. परंतु तरीही आम्हाला आमच्या हक्काच्या घरात जाऊ द्या, अशी मागणी या विस्थापित झालेल्या रहिवाशांनी केली आहे.

ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन बाजूच्या सहा इमारतींमधील १७४ कुटुंबांना माजी नगरसेवक संजय मोरे यांच्या मदतीने तत्काळ बाजूच्या खासगी शाळेत तसेच हॉलमध्ये स्थलांतरित केले. पहाटेपासून या या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला चहा, नास्ता, पाणी, अंघोळीसाठी पाणी आदींसह इतर व्यवस्था केली आहे, तर दुपारच्या जेवणाची सोय शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी येथील हॉलमध्ये केली आहे. त्यामुळे रहिवाशांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे शिव भुवन इमारतीच्या टेरेसवर पाणी साचले होते. त्यामुळे तिचे बीम हलण्यास सुरुवात झाली, तसेच काही भाग कोसळल्याची घटना घडली. रात्री १ ते २ च्या दरम्यान या एका मागून एक घटना घडल्या. त्यामुळे आम्ही घाबरलो आणि तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यासह आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन इतर रहिवाशांना सांगून इमारती खाली करून अवघ्या एका तासात आम्हाला सुरक्षितस्थळी हलविले. त्यानंतर आम्हाला चहा, नास्ता, पाणी आदींसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत; परंतु बाहेर कोरोनाची साथ सुरू असल्याने सर्वांना अशा प्रकारे एकत्र ठेवल्यामुळे मनात थोडीशी भीती आहे. असे असले तरी आम्ही तोंडाला मास्क लावूनच वावरत आहोत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करीत आहोत.

महापालिकेने आता दोन दिवसांची मुदत दिली असून, त्या दोन दिवसांत सदरची धोकादायक इमारत तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. परंतु, आम्हाला आमच्या हक्काच्या घरात जाऊ द्या, अशी मागणी हे रहिवासी करीत आहेत. इतर इमारतींमधून हलविलेल्या कुटुंबांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. एका वृद्ध नागरिकाची प्रकृती खालावली आहे. त्यांनादेखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. असे असले तरी पावसाची परिस्थिती आणि कोरोना अद्यापही शांत झाला नसल्याने आम्हाला आमच्या घरात जाऊ द्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

आम्हाला येथे योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चहा, नास्ता, जेवणाचीही सुविधा देण्यात आली आहे. परंतु, आमची एकच मागणी आहे, बाहेरची परिस्थिती पाहता आम्हाला आमच्या हक्काच्या घरात जाऊ द्या!.

(विवेक जोशी, पांडुरग सदन रहिवासी)

पहाटेपासून आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत. बाजूच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. त्यांना चहा, नास्ता, जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

(संजय मोरे - माजी महापौर, ठामपा)

अष्टमी निवास तळ अधिक चार मजल्याची इमारत - ६४ कुटुंब

पाडुरंग सदन तळ अधिक चार - २४ कुटुंब,

श्रीराम निवास तळ अधिक चार - १८ कुटुंब,

श्रीगणेश निवास तळ अधिक चार - २१ कुटुंब,

पांडे दुर्गा निवास तळ अधिक चार - २९ कुटुंब

राम निवास तळ अधिक चार - १८ कुटुंब