शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

गुणपत्रिकेवरील ‘कोविड-१९’ उल्लेखामुळे वादगुणपत्रिकेवरील ‘कोविड-१९’ उल्लेखामुळे वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:43 IST

सुपेह विद्यालयातील प्रकार : पालकमंत्र्यांच्या निर्देशांना जिल्ह्यातील शाळांकडून हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड-१९’ असा केलेला उल्लेख वगळून नवीन गुणपत्रिका वितरित करण्याबाबत निर्देश देताना कृषीमंत्री दादा भुसे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याला पंधरवडाही उलटलेला नसताना डहाणू तालुक्यातील बोर्डीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयाने (सुपेह) नववी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड-१९ पॅनडेमिक सिच्युएशन’ असा उल्लेख केल्याने पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला आहे. डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप केले असून त्यावर ‘कोविड-१९ पॅनडेमिक सिच्युएशन’ असा उल्लेख केला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठातील बी.एस्सी.च्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-१९ असा उल्लेख आढळल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी लावून धरल्यानंतर गुणपत्रिकेवर कोरोनाचा उल्लेख करण्याचा निर्णय कोणी घेतला, याची चौकशी करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला दिले होते. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याची घोषणा भुसे यांनी केली होती. त्यानंतर, गुणपत्रिकेवरचा कोविड-१९ उल्लेख वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यभर गाजलेल्या या प्रकाराला पंधरवडाही उलटला नसताना पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील सुपेह विद्यालयात असाच प्रकार उघडकीस आला आहे. शाळेने गुणपत्रिका दिल्यानंतर काही पालकांना ही बाब खटकल्यानंतर चर्चेला तोंड फुटले. दरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असून या जिल्ह्यातच त्यांचे निर्देश डावलल्याची चर्चा सुरू आहे.असा उल्लेख नियमबाह्य!गुणपत्रिकेवर कोविड-१९ या उल्लेखाबाबत पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, असा उल्लेख करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले. शाळांनी गुणपत्रिकेवर कोविड-१९ असा उल्लेख करू नये. ते नियमबाह्य असल्याचेही ते म्हणाले....तर या आदिवासी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांवर याचा होणारा परिणाम पाहता प्रशासन कोणता निर्णय घेते तसेच पालकमंत्री कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे.