शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

गुणपत्रिकेवरील ‘कोविड-१९’ उल्लेखामुळे वादगुणपत्रिकेवरील ‘कोविड-१९’ उल्लेखामुळे वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:43 IST

सुपेह विद्यालयातील प्रकार : पालकमंत्र्यांच्या निर्देशांना जिल्ह्यातील शाळांकडून हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड-१९’ असा केलेला उल्लेख वगळून नवीन गुणपत्रिका वितरित करण्याबाबत निर्देश देताना कृषीमंत्री दादा भुसे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याला पंधरवडाही उलटलेला नसताना डहाणू तालुक्यातील बोर्डीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयाने (सुपेह) नववी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड-१९ पॅनडेमिक सिच्युएशन’ असा उल्लेख केल्याने पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला आहे. डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप केले असून त्यावर ‘कोविड-१९ पॅनडेमिक सिच्युएशन’ असा उल्लेख केला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठातील बी.एस्सी.च्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-१९ असा उल्लेख आढळल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी लावून धरल्यानंतर गुणपत्रिकेवर कोरोनाचा उल्लेख करण्याचा निर्णय कोणी घेतला, याची चौकशी करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला दिले होते. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याची घोषणा भुसे यांनी केली होती. त्यानंतर, गुणपत्रिकेवरचा कोविड-१९ उल्लेख वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यभर गाजलेल्या या प्रकाराला पंधरवडाही उलटला नसताना पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील सुपेह विद्यालयात असाच प्रकार उघडकीस आला आहे. शाळेने गुणपत्रिका दिल्यानंतर काही पालकांना ही बाब खटकल्यानंतर चर्चेला तोंड फुटले. दरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असून या जिल्ह्यातच त्यांचे निर्देश डावलल्याची चर्चा सुरू आहे.असा उल्लेख नियमबाह्य!गुणपत्रिकेवर कोविड-१९ या उल्लेखाबाबत पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, असा उल्लेख करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले. शाळांनी गुणपत्रिकेवर कोविड-१९ असा उल्लेख करू नये. ते नियमबाह्य असल्याचेही ते म्हणाले....तर या आदिवासी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांवर याचा होणारा परिणाम पाहता प्रशासन कोणता निर्णय घेते तसेच पालकमंत्री कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे.