शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

किमान वेतनावरून ठेकेदार परिवहन कर्मचाऱ्यांत संघर्ष

By admin | Updated: November 17, 2016 04:54 IST

वसई विरार पालिकेच्या परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मिळायला हवे अशी मागणी करीत असहकार आंदोलन सुुरु केले आहे.

वसई : वसई विरार पालिकेच्या परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मिळायला हवे अशी मागणी करीत असहकार आंदोलन सुुरु केले आहे. तर ठेकेदाराने तोटा होत असल्याचे कारण पुढे करीत कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे. इतकेच नाही तर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याने कामगारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठेकेदार आणि कामगारांमधील संषर्घ टोकाला पोहचला आहे. वसई विरार महापालिकेने २०१२ साली मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट कंपनी लिमिटेड या खाजगी ठेकेदारामार्फत परिवहन सेवा सुरू केली आहे. कंपनीमार्फत दहा वर्षांच्या करारावर ही परिवहन सेवा सुरू करण्यात आली असून ३७ मार्गांवर ही सेवा सुरू आहे. या कंपनीत ७०० हून अधिक कर्मचारी ठेका पद्धतीवर काम करीत आहेत. परिवहन कर्मचाऱ्यांनी नव्याने स्थापन केलेल्या श्रमजीवी वाराई माथाडी कामगार संघटनेने महापालिकांना लागू केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था करारानुसार किमान वेतन मिळावे अशी मागणी केली आहे. कंपनीचे संचालक मनोहर सकपाळ यांनी वाढीव वेतनवाढ देण्यास नकार दिला आहे. त्यासाठी कामगार आयुक्तांनी सादर केलेल्या पत्राचा हवाला त्यांनी दिला आहे. परिवहन सेवेतील कामगार हे सार्वजनिक मोटार वाहतूक या अनुसूचित उद्योगासाठी निर्धारीत केलेल्या वर्गात मोडतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी असलेले किमान वेतन आयोग लागू होत नसल्याचे सकपाळ यांचे म्हणणे आहे. सार्वजिनक मोटार वाहतूक वर्गाप्रमाणे या सर्व कामगारांना लाभांश आणि भत्ते दिले जातात. कुठल्यागी नियमाची पायमल्ली होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कामगार संघटना वेतनवाढीच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. दुसरीकडे, परिवहन सेवा ही महापालिकेची आहे. ठेकेदार कामगारांना कुठल्या वर्गात मोडतो ते महत्वाचे नाही. त्यामुळे शासनाने निर्धारीत केलेल्या किमान वेतन कायद्यानुसार या सर्व कामगारांना १७ हजारांपर्यंत वेतन मिळाले पाहिजे. याप्रकरणी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे संघटनेचे नेते विवेक पंडित यांनी सांगितले. कामगारांनी वेतनवाढीच्या मुद्द्यावरून असहकार पुकारल्याने दररोज सव्वा लाख रुपयांचा तोटा होत असून गेल्या तीन महिन्यात ४० लाखांहून अधिक तोटा झाला आहे. कामगारांना वेतनवाढ देण्यास नकार दिल्याने ते पूर्वीप्रमाणे परिणामकारक पध्दतीने काम करत नाहीत. त्यामुळेच उत्पन्न घटले आहे. कामगारांचा असहकार असाच सुरू राहिला तर मला कामगार कपात करावी लागेल, असे संचालक सकपाळ यांचे म्हणणे आहे. कामगारांनी संप केल्यास त्यांच्यावर मेस्सा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा देणारा फलकही कंपनीच्या बाहेर लावला आहे. यामुळे मोठे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)