शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

कंत्राटी सफाई कामगारांचा ‘ठिय्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:38 IST

केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कंत्राटी कामगारांंचा दोन महिन्यांचा पगार थकल्याने कामगारांनी सोमवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करून महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली.

कल्याण : केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कंत्राटी कामगारांंचा दोन महिन्यांचा पगार थकल्याने कामगारांनी सोमवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करून महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली.महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राजेश उज्जैनकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. विशाल एक्स्पर्ट या कंत्राटदार कंपनीने कचरावाहू वाहनांवर ४०३ कामगार नेमले आहेत. महापालिका या कंपनीची बिले नियमित अदा करत असून काही कामगारांना वेतन देत आहे. मात्र, मनसेच्या कामगार संघटनेशी संबंधित २५० कामगारांना आकसातून पगार दिला जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. कंत्राटदाराच्या मनमानीमुळे २० नोव्हेंबरला कामगारांनी कंपनीच्या कर्णिक रोडवरील कार्यालयाला टाळे ठोकले होते. त्यानंतरही कंत्राटदाराने काहीच प्रतिसाद न दिल्याने कामगारांनी मुख्यालयाच्या प्रवेसद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.उज्जैनकर म्हणाले की, कामगार हमीपत्र देण्यास तयार आहेत. महापालिकेकडून हमीपत्राचा नमुनाच दिला जात नाही. माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता महापालिकेला कामाच्या बिलासोबत ४०३ कामगारांची यादी जोडली असल्याचे समजते. कामगारांच्या हजेरी शेडमध्ये १२५ कामगारच दाखवले आहेत.यासंदर्भात कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आयुक्त संतप्त झाले. कंत्राटदाराने कामगारांचा पगार दिला पाहिजे. कंत्राटी कामगार हे महापालिकेचे नसून कंत्राटदार कंपनीकडे कामाला आहेत. कंत्राटदाराला महापालिकेने बिल अदा केलेले आहे. तरीदेखील कंत्राटदार पगार देत नसल्याने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी आरोग्य खात्यातील अधिकारी विलास जोशी यांना दिले आहे.>‘पगारातील सात हजार गेले कुठे ?महापालिका करारानुसार पगारासाठी वाहनचालकाला १७ हजार ५७० रुपये, तर सफाई कामगारांसाठी १८ हजार ४१६ रुपये देते. कंत्राटदार मात्र प्रत्येकी १० हजार १३६ रुपयेच पगार अदा करत आहे. पाच टक्के सेवाकर आकारला तरी सफाई कामगाराला १७ हजार रुपये हाती यायला हवेत. त्यामुळे कामगारांचे नुकसान होत आहे. मग, वरचे सात हजार कुठे जातात, असा सवालही उज्जैनकर यांनी केला आहे.