शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कंत्राटी सुरक्षारक्षकांचा नगरसेवकांना पुळका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : महापालिकेने सरकारच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक मंडळाकडून सुरक्षारक्षक घेऊन खासगी सैनिक सिक्युरिटीचे कर्मचारी कमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : महापालिकेने सरकारच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक मंडळाकडून सुरक्षारक्षक घेऊन खासगी सैनिक सिक्युरिटीचे कर्मचारी कमी केले असताना बुधवारच्या महासभेत काही नगरसेवकांना ठेकेदार व कर्मचारी कमी केल्याचा पुळका आला. परंतु ठेकेदार पालिकेतून प्रति कर्मचारी २१ हजार रुपये घेत असताना प्रत्यक्षात पगार मात्र १० ते १५ हजारच दिला जात असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी अवाक्षर काढले नाही, तर माजी उपमहापौर यांनी सरकारच्या सुरक्षारक्षकांना नेमल्याचे स्वागत केले.

राज्य सुरक्षारक्षक मंडळाकडून सुरक्षारक्षक घेणे बंधनकारक असताना २०१५ मध्ये सैनिक सिक्युरिटीला कंत्राट दिले. २०१८ मध्ये मुदत संपलेली असताना मुदतवाढीवर कंत्राट सुरू आहे. ९८२ कर्मचारी ठेकेदाराकडून सुरक्षारक्षक म्हणून घेतले. अलगीकरण केंद्रात सुरक्षारक्षकांकडून घडलेली बलात्काराची घटना, मारहाण आदी तक्रारींमुळे महापौरांकडे संबंधितांची बैठक घेऊन सरकारच्या मंडळाचे सुरक्षारक्षक मागवण्याचे ठरले. त्या अनुषंगाने २५० सुरक्षारक्षकांची मागणी केली. सरकारच्या मंडळाचे सुरक्षारक्षक आल्याने सैनिकांच्या काही कर्मचाऱ्यांना कमी केले.

बुधवारच्या महासभेत भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी सध्या शहराला सरकारच्या महामंडळाकडील सुरक्षारक्षकांची आवश्यकता नसून, त्यांचा आर्थिक भार उचलण्यास प्रशासन सक्षम नाही, असे म्हटले. माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मात्र महामंडळाच्या रक्षकांना नेमल्याचे समर्थन करत सैनिक सिक्युरिटीला एक मोठे नेतृत्व जावयासारखी वागणूक देत असून हा ठेका रद्द करण्याची मागणी केली. भूमिपुत्रांना प्रशिक्षण देऊन महामंडळाच्या मार्फत सेवेत घेण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या नगरसेविका तारा घरत यांनी मराठी भाषा अवगत असणाऱ्यांना नियमानुसार सेवेत घ्यावे, असा मुद्दा उपस्थित केला.

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी हा निर्णय महापौरांकडे बैठक होऊन घेण्यात आल्याचे सांगितले. सैनिक सिक्युरिटीबद्दलच्या येणाऱ्या तक्रारी, महिला सुरक्षा आदींचा विचार करून महामंडळाकडून सुरक्षारक्षक घेण्यात आले आहेत. आजही ७५ टक्के सुरक्षारक्षक सैनिक सिक्युरिटीचे असून, त्यांचे कंत्राट रद्द केले नसल्याचा खुलासा आयुक्तांनी केला.

------------------------------------------

सत्ताधाऱ्यांना भूमिपुत्राची काळजी नाही

सत्ताधारी भाजपला भूमिपुत्रांचा नव्हे तर सैनिक सिक्युरिटीची काळजी आहे. किमान वेतन कायद्याप्रमाणे सैनिक सिक्युरिटी सुरक्षारक्षक यांना पगार देत नाही. कर्मचाऱ्यांची पिळवणूक होऊन या घोटाळ्यात सत्ताधारी यांचे उखळ पांढरे होत असल्याने त्यांना ठेकेदाराचा पुळका असल्याचा आरोप भूमिपुत्र संघटना आणि मराठी एकीकरण समितीचे सचिन घरत यांनी केला आहे.