शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

भार्इंदरमध्येही घराघरात दूषित पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: July 6, 2017 06:04 IST

नवीन जलवाहिन्यांची काटेकोरपणे स्वच्छता न करताच पाणी सोडण्यात आल्याने केवळ मीरा रोड पुरते नव्हे तर संपूर्ण मीरा- भार्इंदरमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : नवीन जलवाहिन्यांची काटेकोरपणे स्वच्छता न करताच पाणी सोडण्यात आल्याने केवळ मीरा रोड पुरते नव्हे तर संपूर्ण मीरा- भार्इंदरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी भार्इंदर पश्चिम भागातही गढूळ पाणी आले. शहरभर दूषित पाणी आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मीरा रोडच्या शीतलनगर, शांतीपार्क भागात सोमवारपासून दूूषित पाणी पालिकेच्या जलवाहिन्यांमधून येऊ लागले. रहिवाशांनी तक्रारी करूनही पालिकेकडून समाधानकारक उत्तर वा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परंतु दूषित पाणीपुरवठा केवळ शीतलनगर वा शांतीपार्क पुरताच न होता भार्इंदर पूर्व, मीरा रोडमध्येही दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने होत आहे. बुुधवारी भार्इंदर पश्चिम, मुर्धा परिसरात दुर्गंधी पाणी आले. संपूर्ण शहरात दूषित पाणीपुपरवठा होत असताना महापालिकेने मात्र सोयीस्कर डोळेझाकच चालवली. पालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने सत्यस्थिती जाहीर केलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळासह संतापाची लाट उसळली आहे. वास्तविक ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजनेतंर्गत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तर शहरातही अंतर्गत मोठ्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. लहान असो वा मोठी जलवाहिनी टाकल्यानंतर त्याची काटेकोर स्वच्छता करणे अत्यावश्यक असते. परंतु महापालिकेने जलवाहिन्यांच्या स्वच्छतेबद्दल सोयीस्कर दुर्लक्षच केले. पूर्णपणे जलवाहिन्या साफ झालेल्या नसतानाही त्यातून नागरिकांना पाणी सोडण्यात आले. दूषित पाणी हे उकळून पिण्यायोग्य तर सोडाच आंघोळ व कपडे धुण्यासाठीही नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. बाटलीबंद पाण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. गढूळ पाणी इमारतींच्या तळ तसेच गच्चीवरील टाकीत तर गेलेच पण रहिवाशांच्या घरातील टाक्यां मध्ये देखील गेले. त्यामुळे टाक्या साफ करण्याचा नाहक भूर्दंड बसणार आहे. मनसेचे शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भेट घेतली. या वेळी शहरातील दूषित पाणी पुरवठ्याबद्दल आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असताना त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सत्तधारी व प्रशासन या पैकी कुणीच नव्हते. आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून टाक्यांची सफाई करण्यासाठी पडणारा भूर्दंड पालिका देणार का ? असा सवाल सुर्वे यांनी केला आहे. पावसाची सुरूवात व साकेत- ओवळा दरम्यान ७५ दशलक्ष लिटर पाणी योजनेतील नवीन जलवाहिनी सुरू केल्याने एक ते दोन दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. क्लोरीन टाकले असले तरी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. - सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता. महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा कळस असून दूषित पाण्याने संपूर्ण शहराला वेठीस धरले आहे. नव्या जलवाहिन्या पूर्णपणे स्वच्छ केल्याशिवाय त्यांचा वापर करायला नको होता. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. - रोहिदास पाटील, नगरसेवक. पिण्यासाठी वा जेवणासाठी तर सोडाच पण भांडी, कपडे, आंघोळ आदी कामांसाठी देखील वापरू शकत नाही इतके घाणेरडे पाणी येत आहे. स्वच्छ पाणी आणायचे तरी कुठून ? पालिकेने टँकरने पाणी द्यावे.- रंजना पाटील, गृहिणी.