शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

अंबा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:37 IST

वाकण-पाली मार्गावरील पूल : भार पेलण्याची क्षमता ७५ टन; उंची, रुंदी वाढवली

विनोद भोईर

पाली : वाकण-पाली मार्गावरील अंबा नदीवर नवीन पुलाच्या निर्माणाचे काम सुरू झाले आहे. या नवीन पुलाची रुंदी १६ मीटर असून उंची जुन्या पुलापेक्षा पाच ते सहा फूट अधिक होणार आहे आणि भार पेलण्याची क्षमता तब्बल ७५ टन म्हणजे जुन्या पुलापेक्षा साडेतीनपट अधिक असणार आहे. पुलाचे निर्माण काम सुरू झाल्याने प्रवासी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी दुथडी भरून वाहते. या दिवसांत अंबा नदी पुलावरून नेहमी पाणी जाते. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबते. तसेच पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून जातात. तसेच क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने जाणे, पुलावरील खड्डे यामुळे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे. परिणामी पुलावरून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे. नवीन पुलामुळे आता येथून प्रवास करणे सुरक्षित व सुलभ होणार आहे.

पाली-खोपोली मार्गावरील जांभूळपाडा व भालगुल येथील पुलांची दुरवस्था झाली असून ते पूलदेखील धोकादायक झाले आहेत. मात्र या दोन्ही पुलांच्या जागी आता नवीन व अंबा नदी पुलाप्रमाणेच पूल बांधले जाणार आहेत. त्यांचेही काम या आठवडाभरात सुरू होणार असल्याचे एमएसआरडीसी चे उपअभियंता सचिन निफाडे यांनी सांगितले. यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरून प्रवास करणे सुखकर होणार आहे. वाकण-पाली खोपोली मार्गावरील हे तिन्ही पूल मुंबई- गोवा महामार्ग व मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाला जोडतात. मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते. केवळ १९ टन वजन भार पेलण्याची क्षमता असलेल्या या पुलांवरून ६० टनाची वाहतूक होत आहे. त्यामुळे हे पूल दिवसेंदिवस कमकुवत व धोकादायक होत आहेत. मात्र, आता पाली, जांभूळपाडा व भालगुल येथे नव्याने होणारे पूल हे आधीच्या पुलांपेक्षा पाच ते सहा फूट उंच होणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी जाऊन वाहतूक खोळंबणार नाही. या पुलांची क्षमता ७५ टन वजन सहन करण्याची असल्याने बळकटी मिळणार आहे. रुंदीही जास्त असणार आहे. एकाच वेळी वाहने जाऊ शकणार आहेत.तीनही पुलांचे काम नऊ महिन्यांत म्हणजे सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल. सुरुवातीस आठ मीटर रुंदीचे पूल एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर जुने पूल तोडून त्या जागी दुसरे आठ मीटरचे पूल बांधण्यात येतील. दर्जेदार व योग्य वेळेत काम पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.- सचिन निफाडे,उपअभियंता,एमएसआरडीसीपाली-वाकण मार्गावर अंबा नदीवरील पूल तसेच पाली-खोपोली मार्गावर जांभूळपाडा आणि भालगुल हे तीनही पूल कमकुवत होऊन वाहतुकीसाठी धोकादायक झाले आहेत. पावसाळ्यात तर पुलावरून पाणी गेल्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत असते. त्यामुळे वेळीच नवीन पुलांची निर्मिती होणे गरजेचे होते. सद्य:स्थिती पाली-वाकण मार्गावर अंबा नदी पुलाचे काम सुरू आहे. काही दिवसांनी जांभूळपाडा व भालगुल येथील नवीन पुलांची कामे सुरू होतील, मात्र हे नवीन होणारे पूल दर्जेदार होणे आवश्यक आहे.- सुशील शिंदे,सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस,पाली शहर

टॅग्स :thaneठाणे