शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शेतकरी वर्गाला शहराशी जोडणार

By admin | Updated: January 11, 2017 07:19 IST

नाम संस्थेतर्फे शेतकरी वर्गाला शहरांत बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असून शेतकऱ्याला ग्राहकाशी थेट जोडले जाणार आहे. तसेच, यावर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भावर जास्त

ठाणे : नाम संस्थेतर्फे शेतकरी वर्गाला शहरांत बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असून शेतकऱ्याला ग्राहकाशी थेट जोडले जाणार आहे. तसेच, यावर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भावर जास्त लक्ष असणार आहे, असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले ते अनासपुरे यांनी. त्यांना नामच्या आगामी योजनांसदर्भात विचारले असता ते म्हणाले की, एप्रिल महिन्यात ठाण्यासह आठ ते दहा शहरांत धान्य महोत्सव घेण्याचा प्रयत्न आहे. तसेच, एका नामांकीत कंपनीशी बोलणी झाली असून ते ६२ हजार एकरवरील तूर, मूग, हरभरा, उडीद हे कडधान्य विकत घ्यायला तयार आहेत. मराठवाड्यात पाण्याचे काम सुरू झाले असून ५७२ किमी नाले, तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण केले आहे. साधारण २० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून जिथे ते एक पीक घेतात तिथे तीन पिके घेतील. शासन ही अवाढव्य यंत्रणा आहे. त्यांच्याकडे सर्व उपलब्ध असले तरी सिस्टीमचा भाग अत्यंत भ्रष्ट आहे. एक शेतकरी एका दाण्यापासून हजारो दाणे निर्माण करतो. परंतु त्याला किंमत नाही. आत्महत्त्या पळपुटेपणा असला तरी शेतकरी ती का करतो याचा विचार सर्वांनी करावा. शेतकऱ्यांची एकजूट नसल्याने त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे दोन वर्ग आहेत. एक बागायतदारांचा आणि दुसरा कोरडवाहू शेतकऱ्यांचा जे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शासन शेतकऱ्यांसाठी योजना आखताना सरसकट विचार करते. खरे तर कोरडवाहू शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे आणि आत्महत्त्या करणारा हा वर्ग आहे,अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या संघर्ष प्रवासाबद्दल विचारले असते ते म्हणाले की, मला संघर्षावर बोलणे फारसे आवडत नाही. संघर्षाकडे मी नेहमी सकारात्मकतेने पाहिले आहे. संघर्षाचा काळ मी आनंदात घालविला. इंग्रजी भाषा ही जगण्यासाठी अपरिहार्य असली तरी मातृभाषा शिकण्याचा आग्रह असावा. अलिकडे रिअल हिरोंपेक्षा रील हिरोंना जास्त किंमत आहे आणि हे समाजाच्यादृष्टीने घातक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)