शहरं
Join us  
Trending Stories
1
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
2
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
3
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
4
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
5
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
6
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
7
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
8
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
9
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
10
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
11
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
12
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
13
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
14
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
15
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
16
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
17
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
18
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
19
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
20
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी वर्गाला शहराशी जोडणार

By admin | Updated: January 11, 2017 07:19 IST

नाम संस्थेतर्फे शेतकरी वर्गाला शहरांत बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असून शेतकऱ्याला ग्राहकाशी थेट जोडले जाणार आहे. तसेच, यावर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भावर जास्त

ठाणे : नाम संस्थेतर्फे शेतकरी वर्गाला शहरांत बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असून शेतकऱ्याला ग्राहकाशी थेट जोडले जाणार आहे. तसेच, यावर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भावर जास्त लक्ष असणार आहे, असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले ते अनासपुरे यांनी. त्यांना नामच्या आगामी योजनांसदर्भात विचारले असता ते म्हणाले की, एप्रिल महिन्यात ठाण्यासह आठ ते दहा शहरांत धान्य महोत्सव घेण्याचा प्रयत्न आहे. तसेच, एका नामांकीत कंपनीशी बोलणी झाली असून ते ६२ हजार एकरवरील तूर, मूग, हरभरा, उडीद हे कडधान्य विकत घ्यायला तयार आहेत. मराठवाड्यात पाण्याचे काम सुरू झाले असून ५७२ किमी नाले, तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण केले आहे. साधारण २० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून जिथे ते एक पीक घेतात तिथे तीन पिके घेतील. शासन ही अवाढव्य यंत्रणा आहे. त्यांच्याकडे सर्व उपलब्ध असले तरी सिस्टीमचा भाग अत्यंत भ्रष्ट आहे. एक शेतकरी एका दाण्यापासून हजारो दाणे निर्माण करतो. परंतु त्याला किंमत नाही. आत्महत्त्या पळपुटेपणा असला तरी शेतकरी ती का करतो याचा विचार सर्वांनी करावा. शेतकऱ्यांची एकजूट नसल्याने त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे दोन वर्ग आहेत. एक बागायतदारांचा आणि दुसरा कोरडवाहू शेतकऱ्यांचा जे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शासन शेतकऱ्यांसाठी योजना आखताना सरसकट विचार करते. खरे तर कोरडवाहू शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे आणि आत्महत्त्या करणारा हा वर्ग आहे,अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या संघर्ष प्रवासाबद्दल विचारले असते ते म्हणाले की, मला संघर्षावर बोलणे फारसे आवडत नाही. संघर्षाकडे मी नेहमी सकारात्मकतेने पाहिले आहे. संघर्षाचा काळ मी आनंदात घालविला. इंग्रजी भाषा ही जगण्यासाठी अपरिहार्य असली तरी मातृभाषा शिकण्याचा आग्रह असावा. अलिकडे रिअल हिरोंपेक्षा रील हिरोंना जास्त किंमत आहे आणि हे समाजाच्यादृष्टीने घातक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)