शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

विनापरवानगी मोर्चाप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:49 IST

जामिनावर सुटका : जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन

ठाणे : पोलिसांनी परवानगी नाकारूनही ठाणे महापालिकेविरोधात मोर्चा काढणाऱ्या काँग्रेसचे नेते रवींद्रनाथ आंग्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बुधवारी अटक करून जामिनावर सुटका केली. त्यानंतर, मोर्चेकºयांच्या पाच जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देऊन त्यामध्ये महापालिकेतील कारभाराची लाचलुचपत विभाग व सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. तसेच महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत साखळी उपोषणाला पोलिसांनी परवानगी दिल्याने ते ठाणे रेल्वेस्टेशनबाहेर सुरू राहील. मात्र, या दडपशाहीच्या प्रकाराबद्दल आंग्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

गेल्या पाच वर्र्षांत ठाणे महापालिकेमध्ये विविध खात्यामधील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे वृत्तपत्रांतून बाहेर आली. टीडीआर व बांधकाम टीडीआर घोटाळा, वर्तकनगर म्हाडा पुनर्विकास, शिक्षण खात्यातील गैरप्रकार, रस्तेबांधणी, घनकचरा विभागातील गैरव्यवहार, बीएसयूपी घरे वाटप, नालेसफाई घोटाळ्यास काही मोठे बिल्डर व अधिकाºयांनी संगनमत करून अनधिकृतपणे व नियम तोडून केलेल्या बांधकामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी बुधवारी काँग्रेसमार्फत ठामपावरून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण देऊन मोर्चास परवानगी नाकारली. तरीसुद्धा तो काढण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी आंग्रे यांच्यासह अनिल साळवी, सदानंद भोसले, नीता मगर, सुमनताई वाघ यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.हे आंदोलन काँग्रेसप्रणीत नव्हते- शिंदेठाणे काँग्रेस पक्षात नुकतेच प्रवेश केलेले रवींद्रनाथ आंग्रे यांनी ठामपा प्रशासनाविरु द्ध आंदोलनाचे हत्यार उगारले होते. मात्र, हे आंदोलन ठाणे काँग्रेसप्रणीत नव्हते, असे काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रक काढून स्पष्ट केले.