शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

काँग्रेसही उतरणार रिंगणात?

By admin | Updated: March 31, 2017 05:41 IST

डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक ४६ कांचनगाव-खंबाळपाडाची पोटनिवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चाचपणी

कल्याण : डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक ४६ कांचनगाव-खंबाळपाडाची पोटनिवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चाचपणी सुरू केली असताना आता काँग्रेसनेदेखील ही निवडणूक लढवावी की नाही, याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागितले आहे. भाजपातर्फे साई शेलार यांचे नाव निश्चित झाले आहे. ते रविवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. साई हे दिवंगत नगरसेवक शिवाजी शेलार यांचे सुपुत्र आहेत. केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक ४६ चे भाजपाचे नगरसेवक शिवाजी शेलार यांचे ४ डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या प्रभागात १९ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत एक अर्जाचे वितरण झाले असले तरी एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. भाजपाचे उमेदवार म्हणून शेलार कुटुंबातील साई यांचे नाव निश्चित झाल्याचे पक्षाचे गटनेते वरुण पाटील यांनी सांगितले. दिवंगत झालेल्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील व्यक्तीच निवडणुकीला उभी राहत असेल तर त्याच्याविरोधात आम्ही उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका शिवसेना आणि मनसेने घेतली आहे. परंतु, राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने वरिष्ठांकडे अहवाल पाठवला आहे. उद्या शुक्रवारी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.केडीएमसीच्या २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली होती. त्या वेळी खंबाळपाड्याची जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली होती. परंतु, निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गटाची नोंदणी केली. शेलार कुटुंबाने इतर पक्षांकडे पाठिंबा मिळावा, यादृष्टीने प्रस्ताव देत चर्चाही केली आहे. मात्र, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांचे म्हणणे आहे. दरम्यान, राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागली आहे. त्यांचेही लक्ष वरिष्ठांच्या निर्णयाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)‘त्या’ पोटनिवडणुकीची परतफेड?काँग्रेसचे उपमहापौर पंडित भोईर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि मनसेने उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, भाजपाने त्यांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. याची परतफेड करण्याची वेळ आल्याचा सूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर निर्णय सोपवल्याचे त्यांनी सांगितले.