शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

काँग्रेस-राष्ट्रवादी-भारिपची एकत्रित आघाडी

By admin | Updated: February 2, 2017 03:10 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांचा भारिप यांची आघाडी मनपा निवडणुकीत होण्याचे स्पष्ट संकेत असून जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात

- पंकज पाटील,  उल्हासनगरकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांचा भारिप यांची आघाडी मनपा निवडणुकीत होण्याचे स्पष्ट संकेत असून जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. १५ पॅनलमधील जागावाटपाचा घोळ सुटला असून केवळ ५ पॅनलमधील जागावाटपाचा तिढा सुटणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. आघाडीबाबतची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी ठाण्यात झाली. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाले. जागावाटपाचा तिढा सोडवण्याकरिता पुन्हा उद्या (गुरुवारी) बैठक होणार आहे. सुरुवातीपासून आघाडीसाठी आग्रही असलेल्या काँग्रेसने ओमी यांच्या पक्ष सोडण्यामुळे उतरती कळा लागलेल्या राष्ट्रवादीला साथ देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपला सोबत घेतल्याने काही जागा भारिपला सोडणे बंधनकारक ठरणार आहे. यासोबत स्वाभिमानी संघटना आणि भाई जगताप यांच्या कामगार संघटनेला सोबत घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याने त्यांनाही काही जागा देणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यातच पक्षाचे ‘ए-बी’ फॉर्म दाखल होणार आहेत. राष्ट्रवादीतर्फे गणेश नाईक आणि प्रमोद हिंदुराव हे पुढाकार घेत असून काँग्रेसतर्फे निरीक्षक सुभाष कानडे, प्रभारी निलेश पेढारी पुढाकार घेत आहेत. भाजपा आणि टीम ओमी यांच्या जागावाटपानंतर जे उमेदवार उमेदवारीपासून वंचित राहतील, त्यांना गळाला लावण्याचे काम काँग्रेस करणार आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली जात आहे. ज्या प्रभागात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जागावाटपातील वाद आहेत, त्या जागेवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे. आघाडीकरिता काँग्रेस सुरुवातीपासून प्रयत्नशील होती. समविचारी पक्षांना आणि संघटनांना सोबत घेऊन काँग्रेस निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. उल्हासनगरची त्रस्त जनता काँग्रेससोबत राहील. - निलेश पेढारी, प्रभारी, काँग्रेसआघाडीबाबतची चर्चा सुरू आहे. येत्या एकदोन दिवसांत त्यावर निर्णय घेऊन निवडणूक सोबत लढवण्यात येईल. जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणेच निर्णय घेतले जातील. -प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस