शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

भिवंडीमध्ये काँग्रेसचा ‘एकला चलो रे’ नारा !

By admin | Updated: March 30, 2017 06:27 IST

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या एकमेव महापालिकेकडून काँग्रेस पक्षाला आता अपेक्षा उरल्या आहेत

पंकज रोडेकर / भिवंडीठाणे जिल्ह्यातील भिवंडी या एकमेव महापालिकेकडून काँग्रेस पक्षाला आता अपेक्षा उरल्या आहेत. त्यातच या महापालिकेत नंबर वन असलेल्या काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून आघाडीऐवजी ऐकला चलो रे! असा सूर उमटत आहे. तर, निवडणुकीची कोणतीही घोषणा झाली नसताना, भिवंडीतून ३०० हून अधिक जण पक्षाच्या तिकीटीवर निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भिवंडी महापालिकेत निवडून आलेल्या सदस्यांचा (लोकप्रतिनिधी) कालावधी जून महिन्यात संपत आहेत. त्यानुसार येथे मे महिन्याच्या अखेर निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयाराम आणि गयाराम यांची या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती ठाणे असो वा मुंबई येथे केविलवाणी झाली आहे. मात्र, भिवंडीत काँग्रेसने जिल्ह्यातील इतर निवडणुकांमधील पाठीमागे लागलेला डाग पुसून टाकण्यासाठी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यानुसार, चाचपणी करण्यासाठी किती जण इच्छुक काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी अर्ज वाटप केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानुसार, जवळपास ३०० हून अधिक जणांनी अर्ज नेले आहेत. त्यामधील २५० जणांनी परत अर्ज भरूनसुद्धा सादर केले आहेत. हा प्रतिसाद पाहून काँग्रेस प्रदेशापातळीवरून नियुक्त केलेल्या निरीक्षकांमार्फत येत्या, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या मुखालती घेऊन ते किती सक्षम आहेत हे पाहिले जाणार आहे.ठाणे, उल्हासनगर महापालिकेपाठोपाठ भिवंडीतील आगामी निवडणूकही चार जणांच्या पॅनल पद्धतीने होणार आहे.बारकावे तपासणार मुलाखतीच्या माध्यमातून बारकावे पाहण्यात येणार आहेत. याचदरम्यान, काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा ‘एकला चलो रे’ असा सूर असल्याने आघाडी करायची की नाही, जर करायची तर कुणाशी करायची. याबाबत रणनिती आखली जाणार आहे. नगरसेवकांची संख्या कशी वाढवता येईल, याकडे लक्ष देत काही धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.