शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

भिवंडीमध्ये काँग्रेसचा ‘एकला चलो रे’ नारा !

By admin | Updated: March 30, 2017 06:27 IST

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या एकमेव महापालिकेकडून काँग्रेस पक्षाला आता अपेक्षा उरल्या आहेत

पंकज रोडेकर / भिवंडीठाणे जिल्ह्यातील भिवंडी या एकमेव महापालिकेकडून काँग्रेस पक्षाला आता अपेक्षा उरल्या आहेत. त्यातच या महापालिकेत नंबर वन असलेल्या काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून आघाडीऐवजी ऐकला चलो रे! असा सूर उमटत आहे. तर, निवडणुकीची कोणतीही घोषणा झाली नसताना, भिवंडीतून ३०० हून अधिक जण पक्षाच्या तिकीटीवर निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भिवंडी महापालिकेत निवडून आलेल्या सदस्यांचा (लोकप्रतिनिधी) कालावधी जून महिन्यात संपत आहेत. त्यानुसार येथे मे महिन्याच्या अखेर निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयाराम आणि गयाराम यांची या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती ठाणे असो वा मुंबई येथे केविलवाणी झाली आहे. मात्र, भिवंडीत काँग्रेसने जिल्ह्यातील इतर निवडणुकांमधील पाठीमागे लागलेला डाग पुसून टाकण्यासाठी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यानुसार, चाचपणी करण्यासाठी किती जण इच्छुक काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी अर्ज वाटप केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानुसार, जवळपास ३०० हून अधिक जणांनी अर्ज नेले आहेत. त्यामधील २५० जणांनी परत अर्ज भरूनसुद्धा सादर केले आहेत. हा प्रतिसाद पाहून काँग्रेस प्रदेशापातळीवरून नियुक्त केलेल्या निरीक्षकांमार्फत येत्या, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या मुखालती घेऊन ते किती सक्षम आहेत हे पाहिले जाणार आहे.ठाणे, उल्हासनगर महापालिकेपाठोपाठ भिवंडीतील आगामी निवडणूकही चार जणांच्या पॅनल पद्धतीने होणार आहे.बारकावे तपासणार मुलाखतीच्या माध्यमातून बारकावे पाहण्यात येणार आहेत. याचदरम्यान, काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा ‘एकला चलो रे’ असा सूर असल्याने आघाडी करायची की नाही, जर करायची तर कुणाशी करायची. याबाबत रणनिती आखली जाणार आहे. नगरसेवकांची संख्या कशी वाढवता येईल, याकडे लक्ष देत काही धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.