शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग समिती कार्यालयाला काँग्रेसने ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST

उल्हासनगर : सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका प्रभाग समिती क्रं. २ च्या कार्यालयाला काँग्रेसने सोमवारी टाळे ठोकले. पाणी, ...

उल्हासनगर : सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका प्रभाग समिती क्रं. २ च्या कार्यालयाला काँग्रेसने सोमवारी टाळे ठोकले. पाणी, रस्ते, साफसफाई आदी समस्या सोडवण्याऐवजी भूमाफियांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी कार्यालयाला टाळे ठोकल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.

उल्हासनगर प्रभाग समिती क्रं. २ च्या परिसरातील पाणी, साफसफाई, रस्ते, तुंबलेले नाले आदी समस्यांबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक प्रभाग अधिकारी अनिल खतुरानी यांच्याकडे गेले. मात्र ते भेटत नाही, अशा तक्रारी नागरिकांनी साळवे यांच्याकडे केल्या. साळवे यांनी पक्ष कार्यकर्ता व नागरिकांच्या समस्या सोडवण्याची विनंती खतुरानी यांच्याकडे केली. मात्र या विनंतीला केराची टोपली दाखवित त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकूनही घेतल्या नाहीत. त्यामुळे साळवे यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी दुपारी ३ वाजता खतुरानी यांची खुर्ची बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले.

खतुरानी यांच्या नियुक्तीला नगरसेवकांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच गेल्या आठवड्यात राजकीय दबावाला झुगारून राणा खदान येथील डम्पिंग ग्राउंड येथील आरक्षित भूखंडावरील भल्या मोठ्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई करण्यात आली. या कारवाईने त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र दोन दिवसांनंतर तिथेच बांधकाम ‘जैसे थे’ उभे राहत आहे. या प्रकाराने खतुरानी यांच्यावर पुन्हा टीका होत आहे. खतुरानी यांना सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास वेळ नाही. मग ते बंद कार्यालयात कोणासोबत बसतात, असा प्रश्न साळवे यांनी केला. राहुल गांधी आपणास भेटण्यास येतात का, असा ऊपहास करून खतुरानी यांनी काँग्रेस पक्षाचा अपमान केल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांची झाली.

.............

अवैध बांधकामांना सरंक्षण?

महापालिका प्रभाग समिती क्रं-२ मध्ये रस्ते, साफसफाई, पाणीटंचाई, पाणीगळती आदी समस्या निर्माण होऊन नागरिक हैराण झाले. या समस्या सोडविण्याऐवजी राजकीय नेते, भूमाफिया यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या असंख्य अवैध बांधकामांचे संरक्षण करण्याचे काम प्रभाग समितीचे अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचारी करीत असल्याचा आरोप होत आहे.