शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

नाराजांना थंडोबा करण्यासाठी मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:29 IST

मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून बहुतांश आयारामांना उमेदवारी दिल्यावरून शिवसेनेतील नाराज बंडाचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून बहुतांश आयारामांना उमेदवारी दिल्यावरून शिवसेनेतील नाराज बंडाचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील वरिष्ठांनी कंबर कसली असून नाराज सैनिकांची बैठक बोलवण्यात आली होती.शिवसेनेने एकूण २४ प्रभागांपैकी सातहून अधिक प्रभागांत केवळ आयारामांना संधी देत निम्म्याहून कमी निष्ठावंतांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून शिवसेनेत पक्षनिष्ठा राखणाºयांना डावलल्यामुळे पक्षात नाराजीचा सूर आळवला जाऊ लागला आहे. त्यातच पक्षात बाहेरून आलेल्यांपैकी काहींना महत्त्वाची जबाबदारी दिल्याने निष्ठावंतांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीच्या आदल्या रात्रीच भाजपात उमेदवारी न मिळालेल्यांनी सेनेत मात्र उमेदवारी मिळवली. त्याला नेत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत निष्ठावंतांचा पत्ता कट केला.कानामागून आला अन् तिखट झाला, या उक्तीप्रमाणे सेनेतील निष्ठावंतांची अवस्था झाली आहे. आयारामांच्या वाढत्या उद्रेकामुळे पक्षातील जुन्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठांची धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी बैठका होऊ लागल्या आहेत. त्यात नाराज सैनिक आपल्या मनातील संतापाला वाट करून देत आहेत. यामुळे नेत्यांची पाचावर धारण बसली आहे. नाराजांना शांत करण्यासाठी पक्षहित जोपासण्याचे साकडेही घातले जात आहे. प्रसंगी महत्त्वाच्या सैनिकाला सत्तेत सामावून घेण्याचे आश्वासनही दिले जात आहे.३० ते ३५ वर्षांपासून कार्य करणाºयांना डावलण्याचे प्रकार थेट पक्षप्रमुखांच्या कानी टाकण्याची धमकीही दिली जात आहे. नाराजांची मनधरणी करण्यासाठी मॅक्सस मॉल येथे बैठक बोलावली होती. आयारामांमधील काहींना थेट निष्ठावंतांच्याच डोक्यावर बसवल्याने त्यांचे नखरे सहन करणार नाही, असा इशारा नाराजांनी दिला आहे. निष्ठावंतांची नाराजी दूर करताना वरिष्ठ पदाधिकाºयांची दमछाक होणार हे निश्चित. पक्षात बंडाळी होऊ नये यासाठीही नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.