शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

आयुक्त-लेखाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:43 IST

आयुक्तांमुळे केडीएमसी आर्थिक गर्तेत - गर्जे : हा तर शिस्तभंग - आयुक्त बोडके

कल्याण : केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके आणि लेखा व वित्त अधिकारी का.बा. गर्जे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गर्जे यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून आयुक्तांविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला आहे. आयुक्तांनी चुकीचे निर्णय घेऊन पालिकेचे नुकसान केल्याचा आरोप करत गर्जे यांनी चौकशीची मागणी केली आहे.

शासनाने गर्जे यांना महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी प्रतिनियुक्ती दिली होती. गर्जे यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना पुन्हा सरकारदरबारी पाठवण्याचा ठराव महापालिकेने चार महिन्यांपूर्वी केला होता; मात्र वित्त विभागाने हा ठराव नामंजूर करुन त्यांना पुन्हा रुजू करुन घेण्याचे आदेश दिले. आता आयुक्त आणि गर्जे यांच्यातील वादाला पुन्हा फोडणी मिळाली आहे.

तीन वर्षांत ३५ कोटींचे धनादेश वठले नसून त्याबाबत आयुक्तांनी कठोर कारवाई केलेली नाही. एमआयडीसी हद्दीतून ४० कोटींचा कर थकीत आहे. एलबीटीपोटी बंद असलेल्या एनआरसी कंपनीकडून ६० कोटी रुपये, तर प्रीमिअर कंपनीकडे २० कोटी थकीत आहेत. महापालिकेतील अनेक प्रकल्प पाच ते दहा वर्षांपासून सुरू असून ठेकेदारांचे काम रद्द न करता त्यालाच मुदतवाढ दिली आहे. महापालिकेच्या निवासस्थानात राहत असतानाही त्यांनी घरभत्ता घेतला आहे. तो त्यांच्या वेतनातून वसूल करण्याची मागणी त्यांनी केली.खोटा अहवाल दिल्याचा आरोपआयुक्तांनी मोघम आरोप करून आपणास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कोणत्या तक्रारीच्या आधारे ही नोटीस बजावली, त्या तक्रारीची प्रत आयुक्तांनी दिलेली नाही. त्यांनी वित्त विभागास आपल्याविरोधात खोटा अहवाल सादर केल्याचा आरोप गर्जे यांनी केला आहे. या प्रकरणावरून आयुक्त व गर्जे यांच्यातील संघर्ष वाढत जाणार असल्याची चिन्हे आहेत.गर्जेंच्या बदलीसाठी शासनाकडे पत्रव्यवहारगर्जे यांनी ज्या मुद्यावर तक्रार केली आहे, त्यापैकी बहुतांश मुद्दे हे कायदेशीर बाबींशी संबंधित आहेत. त्यामुळे निर्णय घेतला गेलेला नाही. सरकारकडून विचारणा झाली, तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. त्यात हयगय केली जाणार नाही; मात्र गर्जे यांनी अशा प्रकारे तक्रार करणे, हे शिस्तभंगाच्या अधिनियमात मोडते. त्यामुळे त्यांना महापालिकेत हजर करून घेतलेले नाही, असे आयुक्त बोडके यांनी स्पष्ट केले. या शिस्तभंगाची दखल घेत त्यांची पुन्हा शासनदरबारी बदली करून घ्यावी, यासाठी सरकारला पत्र पाठवल्याची माहितीही त्यांनी दिली.