शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष आणि बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:13 IST

पक्षांनी परस्परांशी केलेला समझोता, तसेच काही संघटनांशी केलेली मैत्री यामुळे गटा-गणात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या बंडखोर, नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

ठाणे : वेगवेगळ््या पक्षांनी परस्परांशी केलेला समझोता, तसेच काही संघटनांशी केलेली मैत्री यामुळे गटा-गणात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या बंडखोर, नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून मतविभागणी टाळण्यासाठी सोमवारी त्यांनी अर्र्ज मागे घ्यावे, यासाठी त्यांचे मन वळवण्यात येत आहे. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना जे उमेदवारीबद्दल निश्ंिचत होते त्यांनी रविवारी प्रचार सुरू केला. वेगवेगळ््या पक्षांनी यानिमित्त आपापल्या कार्यालयांचे उद््घाटन करून प्रचाराचा नारळ फोडला.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेतच मुख्य लढत आहे. त्यानंतर तालुक्यानुसार किंवा गट-गणानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, रिपब्लिकन पक्ष, मनसे असे वेगवेगळे पक्ष रिंगणात आहेत. श्रमजीवी संघटनेने शिवसेनेची साथ सोडून भाजपाला पाठिंबा दिला आहे, तर कुणबी सेना काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांशी समझोता करून उमेदवार दिले आहेत. काही ठिकाणी काँग्रेसनेही त्यांना सहकार्य केले आहे. पण मुरबाडमधील भाजपाच्या नेत्यांनी मात्र मते फोडण्यासाठी आम्ही काँग्रेसला रिंगणात उतरवल्याचा दावा केला आहे. भिवंडी महापालिकेपासून सुरू असलेला शिवसेना- काँग्रेसच्या मैत्रीचा सिलसिला अद्याप या निवडणुकीत प्रत्यक्षात आलेला दिसलेला नाही. मनसेचा जीव छोटा असला, तरी मोजक्या जागा वगळता त्यांनी अजून कोणाला सहकार्य केलेले नाही. रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट भाजपासोबत आहे, तर भारिपने काँग्रेस, राष्ट्रवादीला सहकार्य केले आहे. त्यामुळे गट-गणानुसार राजकीय चित्र बदलते आहे. हे मतदारसंघ आकाराला छोटे असल्याने अवघ्या काही मतांच्या फरकाने उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांची संख्या कमी व्हावी, यासाठी इच्छुक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवार आणि रविवारी वेगवेगळ््या नेत्यांकडून, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींमार्फत मध्यस्थी करून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. सोमवारी दुपारपर्यंत माघारीची वेळ असल्याने तोवर बंडखोरांचे हवे ते हट्ट पुरवण्यासाठी उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. कामाची-कंत्राटाची आश्वासने, नोकरी, एखादे पद, प्रसंगी काही रक्कम देऊन बंडखोरांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अगदीच जमले नाही; तर समाजाचे हित, समाजाचे भले व्हावे, जातीला संधी मिळावी, यासाठी आणाभाका घेतल्या जात आहेत. देवळात किंवा एखाद्या समाजमंदिरात चारचौघांच्या साक्षीने माघारीचा शब्द घेतला जात आहे.भाजपा फोडल्याचा शिवसेनेचा दावाअनगांव : शिवसेनेशी युती करणार असल्याची माहिती पुरवत गोंधळ उडवून देण्याची खेळी करत निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने राजकीय खळबळ माजवली होती. नंतर शिवसेनेसोबत असलेली श्रमजीवी संघटना फोडली. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला, अशी चर्चा असतानाच शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे प्रमुख प्रकाश पाटील यांनी मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपा फोडल्याचा दावा केला. शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय सेक्यूलरसोबत युती झाली असतानाच भाजपा, काँग्रेसचे पदाधिकारी पक्षात आल्याने युतीची ताकद वाढल्याचा दावाही त्यांनी केला. यापुढेही शिवसेनेत इनकमिंग सुरूच राहणार असून त्यामुळे भाजपाला जोरका झटका बसल्याचा दावा त्यांनी केला. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता शेतकºयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. बाधित शेतकºयांना त्यांचा मोबदला मिळायला हवा. आदिवासींना योजनांचा लाभ मिळायला हवा, यावर प्रचारात भर दिल्याचे पाटील म्हणाले.