शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

अपक्ष आणि बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:13 IST

पक्षांनी परस्परांशी केलेला समझोता, तसेच काही संघटनांशी केलेली मैत्री यामुळे गटा-गणात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या बंडखोर, नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

ठाणे : वेगवेगळ््या पक्षांनी परस्परांशी केलेला समझोता, तसेच काही संघटनांशी केलेली मैत्री यामुळे गटा-गणात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या बंडखोर, नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून मतविभागणी टाळण्यासाठी सोमवारी त्यांनी अर्र्ज मागे घ्यावे, यासाठी त्यांचे मन वळवण्यात येत आहे. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना जे उमेदवारीबद्दल निश्ंिचत होते त्यांनी रविवारी प्रचार सुरू केला. वेगवेगळ््या पक्षांनी यानिमित्त आपापल्या कार्यालयांचे उद््घाटन करून प्रचाराचा नारळ फोडला.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेतच मुख्य लढत आहे. त्यानंतर तालुक्यानुसार किंवा गट-गणानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, रिपब्लिकन पक्ष, मनसे असे वेगवेगळे पक्ष रिंगणात आहेत. श्रमजीवी संघटनेने शिवसेनेची साथ सोडून भाजपाला पाठिंबा दिला आहे, तर कुणबी सेना काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांशी समझोता करून उमेदवार दिले आहेत. काही ठिकाणी काँग्रेसनेही त्यांना सहकार्य केले आहे. पण मुरबाडमधील भाजपाच्या नेत्यांनी मात्र मते फोडण्यासाठी आम्ही काँग्रेसला रिंगणात उतरवल्याचा दावा केला आहे. भिवंडी महापालिकेपासून सुरू असलेला शिवसेना- काँग्रेसच्या मैत्रीचा सिलसिला अद्याप या निवडणुकीत प्रत्यक्षात आलेला दिसलेला नाही. मनसेचा जीव छोटा असला, तरी मोजक्या जागा वगळता त्यांनी अजून कोणाला सहकार्य केलेले नाही. रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट भाजपासोबत आहे, तर भारिपने काँग्रेस, राष्ट्रवादीला सहकार्य केले आहे. त्यामुळे गट-गणानुसार राजकीय चित्र बदलते आहे. हे मतदारसंघ आकाराला छोटे असल्याने अवघ्या काही मतांच्या फरकाने उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांची संख्या कमी व्हावी, यासाठी इच्छुक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवार आणि रविवारी वेगवेगळ््या नेत्यांकडून, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींमार्फत मध्यस्थी करून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. सोमवारी दुपारपर्यंत माघारीची वेळ असल्याने तोवर बंडखोरांचे हवे ते हट्ट पुरवण्यासाठी उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. कामाची-कंत्राटाची आश्वासने, नोकरी, एखादे पद, प्रसंगी काही रक्कम देऊन बंडखोरांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अगदीच जमले नाही; तर समाजाचे हित, समाजाचे भले व्हावे, जातीला संधी मिळावी, यासाठी आणाभाका घेतल्या जात आहेत. देवळात किंवा एखाद्या समाजमंदिरात चारचौघांच्या साक्षीने माघारीचा शब्द घेतला जात आहे.भाजपा फोडल्याचा शिवसेनेचा दावाअनगांव : शिवसेनेशी युती करणार असल्याची माहिती पुरवत गोंधळ उडवून देण्याची खेळी करत निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने राजकीय खळबळ माजवली होती. नंतर शिवसेनेसोबत असलेली श्रमजीवी संघटना फोडली. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला, अशी चर्चा असतानाच शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे प्रमुख प्रकाश पाटील यांनी मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपा फोडल्याचा दावा केला. शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय सेक्यूलरसोबत युती झाली असतानाच भाजपा, काँग्रेसचे पदाधिकारी पक्षात आल्याने युतीची ताकद वाढल्याचा दावाही त्यांनी केला. यापुढेही शिवसेनेत इनकमिंग सुरूच राहणार असून त्यामुळे भाजपाला जोरका झटका बसल्याचा दावा त्यांनी केला. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता शेतकºयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. बाधित शेतकºयांना त्यांचा मोबदला मिळायला हवा. आदिवासींना योजनांचा लाभ मिळायला हवा, यावर प्रचारात भर दिल्याचे पाटील म्हणाले.