शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

अपक्ष आणि बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:13 IST

पक्षांनी परस्परांशी केलेला समझोता, तसेच काही संघटनांशी केलेली मैत्री यामुळे गटा-गणात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या बंडखोर, नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

ठाणे : वेगवेगळ््या पक्षांनी परस्परांशी केलेला समझोता, तसेच काही संघटनांशी केलेली मैत्री यामुळे गटा-गणात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या बंडखोर, नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून मतविभागणी टाळण्यासाठी सोमवारी त्यांनी अर्र्ज मागे घ्यावे, यासाठी त्यांचे मन वळवण्यात येत आहे. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना जे उमेदवारीबद्दल निश्ंिचत होते त्यांनी रविवारी प्रचार सुरू केला. वेगवेगळ््या पक्षांनी यानिमित्त आपापल्या कार्यालयांचे उद््घाटन करून प्रचाराचा नारळ फोडला.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेतच मुख्य लढत आहे. त्यानंतर तालुक्यानुसार किंवा गट-गणानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, रिपब्लिकन पक्ष, मनसे असे वेगवेगळे पक्ष रिंगणात आहेत. श्रमजीवी संघटनेने शिवसेनेची साथ सोडून भाजपाला पाठिंबा दिला आहे, तर कुणबी सेना काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांशी समझोता करून उमेदवार दिले आहेत. काही ठिकाणी काँग्रेसनेही त्यांना सहकार्य केले आहे. पण मुरबाडमधील भाजपाच्या नेत्यांनी मात्र मते फोडण्यासाठी आम्ही काँग्रेसला रिंगणात उतरवल्याचा दावा केला आहे. भिवंडी महापालिकेपासून सुरू असलेला शिवसेना- काँग्रेसच्या मैत्रीचा सिलसिला अद्याप या निवडणुकीत प्रत्यक्षात आलेला दिसलेला नाही. मनसेचा जीव छोटा असला, तरी मोजक्या जागा वगळता त्यांनी अजून कोणाला सहकार्य केलेले नाही. रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट भाजपासोबत आहे, तर भारिपने काँग्रेस, राष्ट्रवादीला सहकार्य केले आहे. त्यामुळे गट-गणानुसार राजकीय चित्र बदलते आहे. हे मतदारसंघ आकाराला छोटे असल्याने अवघ्या काही मतांच्या फरकाने उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांची संख्या कमी व्हावी, यासाठी इच्छुक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवार आणि रविवारी वेगवेगळ््या नेत्यांकडून, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींमार्फत मध्यस्थी करून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. सोमवारी दुपारपर्यंत माघारीची वेळ असल्याने तोवर बंडखोरांचे हवे ते हट्ट पुरवण्यासाठी उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. कामाची-कंत्राटाची आश्वासने, नोकरी, एखादे पद, प्रसंगी काही रक्कम देऊन बंडखोरांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अगदीच जमले नाही; तर समाजाचे हित, समाजाचे भले व्हावे, जातीला संधी मिळावी, यासाठी आणाभाका घेतल्या जात आहेत. देवळात किंवा एखाद्या समाजमंदिरात चारचौघांच्या साक्षीने माघारीचा शब्द घेतला जात आहे.भाजपा फोडल्याचा शिवसेनेचा दावाअनगांव : शिवसेनेशी युती करणार असल्याची माहिती पुरवत गोंधळ उडवून देण्याची खेळी करत निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने राजकीय खळबळ माजवली होती. नंतर शिवसेनेसोबत असलेली श्रमजीवी संघटना फोडली. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला, अशी चर्चा असतानाच शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे प्रमुख प्रकाश पाटील यांनी मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपा फोडल्याचा दावा केला. शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय सेक्यूलरसोबत युती झाली असतानाच भाजपा, काँग्रेसचे पदाधिकारी पक्षात आल्याने युतीची ताकद वाढल्याचा दावाही त्यांनी केला. यापुढेही शिवसेनेत इनकमिंग सुरूच राहणार असून त्यामुळे भाजपाला जोरका झटका बसल्याचा दावा त्यांनी केला. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता शेतकºयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. बाधित शेतकºयांना त्यांचा मोबदला मिळायला हवा. आदिवासींना योजनांचा लाभ मिळायला हवा, यावर प्रचारात भर दिल्याचे पाटील म्हणाले.