शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

बाहेरगावच्या प्रवाशांनी वाढवली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण हे रेल्वेचे जंक्शन आहे. तसेच रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असे केंद्रस्थान आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण हे रेल्वेचे जंक्शन आहे. तसेच रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असे केंद्रस्थान आहे. त्यामुळे शहरात रेल्वे आणि रस्ते वाहतुकीद्वारे बाहेरगावाहून येणारी प्रवासीसंख्या जास्त आहे. साहजिकच, बाहेरगावाहून येणाऱ्यांमुळे शहरात कोरोना पसरण्याची दाट शक्यता आहे. रेल्वेचे जंक्शन आणि कल्याण एसटी डेपो ही प्रमुख सार्वजनिक प्रवासी स्थानके असली, तरी शहरात खाजगी टॅक्सी वाहतूक, बस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. खाजगी बसगाड्या अंतर्गत जिल्ह्यासह अन्य राज्यांतून प्रवास करतात. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत टिटवाळा, आंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी, डोंबिवली, कोपर, अप्पर कोपर, ठाकुर्ली, दिवा-पनवेल मार्गावरील दातिवली, निळजे ही रेल्वेस्थानके येतात. या रेल्वे स्थानकांतून प्रवास करणारे प्रवासी त्याचबरोबर डोंबिवली बसस्थानकातून प्रवास करणारे प्रवासी यांची एकूण संख्या लाखोंच्या घरात आहे. कल्याण रेल्वे आणि बस डेपोत प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात असली, तरी खाजगी वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात नाही. त्याचबरोबर चेकनाके आणि शहराच्या हद्दीवर कोरोना चाचणी केली जात नाही.

-----------

रेल्वे

कल्याण रेल्वेस्थानकात तीन शिफ्टमध्ये कोरोना चाचणी केंद्र चालविले जाते. त्याठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये २०० प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. एकूण ६०० प्रवाशांची कोरोना चाचणी तीन शिफ्टमध्ये केली जाते. बाहेरगावच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता चाचणीचे प्रमाण व्यस्त आहे. उपनगरीय आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांद्वारे दिवसाला तीन लाख प्रवासी प्रवास करतात.

------------

बस डेपो

कल्याण बस डेपोमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजताच्या दरम्यान प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. अन्य वेळेत कोरोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे त्या वेळेत परगावांहून शहरात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. चार तासांत केवळ १०० प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. दिवसाला १० हजार प्रवासी डेपोतून प्रवास करतात.

--------------

ट्रॅव्हल्स

शहरातून खाजगी बस चालवल्या जातात. राज्यात व राज्याबाहेर या बस चालतात. त्यातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. टॅक्सी कॅब चालतात. त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही कोरोना चाचणी केली जात नाही.

---------------

बाहेरगावांतून येणाऱ्यांची चाचणी मोजक्याच जागी

कल्याण रेल्वेस्थानक व कल्याण बस डेपो येथे बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. मात्र, दिवा-वसई आणि दिवा-पनवेल मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. तसेच विठ्ठलवाडी बस डेपो आणि डोंबिवली बसस्थानकात कोरोना चाचणी केली जात नाही. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील आणि अन्य राज्यांतून शेतमाल घेऊन येणारे टेम्पो, ट्रकचालक व शेतमाल विक्रेते शेतकरी यांची कोरोना चाचणी केली जात नाही. रस्ते वाहतुकीद्वारे शहरात अनेक एण्ट्री पॉइंट आहेत. त्याठिकाणी चाचणी केली जात नाही.

------------

कल्याण रेल्वेस्थानक आणि बस डेपोत बाहेरगावांतून आलेल्या प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर घेऊन कोरोना चाचणी केली जाते. मात्र, त्यापैकी किती प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह होते, याचा तपशील प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्या गावातून कल्याण-डोंबिवलीत कोरोना दाखल होतो, हे सुस्पष्ट नाही. मात्र यूपी, बिहारमधून जास्त प्रवासी कल्याण, डोंबिवलीत येतात. त्याचबरोबर आंतरराज्य अहमदनगर, नाशिक, धुळे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, पुणे या ठिकाणांहून सरकारी व खाजगी बसने प्रवासी जास्त कल्याणच्या दिशेने प्रवास करतात.

-------------

पॉइंटर्स

एकूण कोरोना रुग्ण- ७८ हजार २८७

बरे झालेले रुग्ण- ६८ हजार ६३८

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण- ८ हजार ४२७

होम क्वारंटाइन झालेले एकूण रुग्ण- ४६ हजार ५९७

एकूण बळी- १ हजार २२२

------------------------

वाचली