शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बाहेरगावच्या प्रवाशांनी वाढवली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण हे रेल्वेचे जंक्शन आहे. तसेच रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असे केंद्रस्थान आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण हे रेल्वेचे जंक्शन आहे. तसेच रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असे केंद्रस्थान आहे. त्यामुळे शहरात रेल्वे आणि रस्ते वाहतुकीद्वारे बाहेरगावाहून येणारी प्रवासीसंख्या जास्त आहे. साहजिकच, बाहेरगावाहून येणाऱ्यांमुळे शहरात कोरोना पसरण्याची दाट शक्यता आहे. रेल्वेचे जंक्शन आणि कल्याण एसटी डेपो ही प्रमुख सार्वजनिक प्रवासी स्थानके असली, तरी शहरात खाजगी टॅक्सी वाहतूक, बस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. खाजगी बसगाड्या अंतर्गत जिल्ह्यासह अन्य राज्यांतून प्रवास करतात. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत टिटवाळा, आंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी, डोंबिवली, कोपर, अप्पर कोपर, ठाकुर्ली, दिवा-पनवेल मार्गावरील दातिवली, निळजे ही रेल्वेस्थानके येतात. या रेल्वे स्थानकांतून प्रवास करणारे प्रवासी त्याचबरोबर डोंबिवली बसस्थानकातून प्रवास करणारे प्रवासी यांची एकूण संख्या लाखोंच्या घरात आहे. कल्याण रेल्वे आणि बस डेपोत प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात असली, तरी खाजगी वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात नाही. त्याचबरोबर चेकनाके आणि शहराच्या हद्दीवर कोरोना चाचणी केली जात नाही.

-----------

रेल्वे

कल्याण रेल्वेस्थानकात तीन शिफ्टमध्ये कोरोना चाचणी केंद्र चालविले जाते. त्याठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये २०० प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. एकूण ६०० प्रवाशांची कोरोना चाचणी तीन शिफ्टमध्ये केली जाते. बाहेरगावच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता चाचणीचे प्रमाण व्यस्त आहे. उपनगरीय आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांद्वारे दिवसाला तीन लाख प्रवासी प्रवास करतात.

------------

बस डेपो

कल्याण बस डेपोमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजताच्या दरम्यान प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. अन्य वेळेत कोरोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे त्या वेळेत परगावांहून शहरात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. चार तासांत केवळ १०० प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. दिवसाला १० हजार प्रवासी डेपोतून प्रवास करतात.

--------------

ट्रॅव्हल्स

शहरातून खाजगी बस चालवल्या जातात. राज्यात व राज्याबाहेर या बस चालतात. त्यातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. टॅक्सी कॅब चालतात. त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही कोरोना चाचणी केली जात नाही.

---------------

बाहेरगावांतून येणाऱ्यांची चाचणी मोजक्याच जागी

कल्याण रेल्वेस्थानक व कल्याण बस डेपो येथे बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. मात्र, दिवा-वसई आणि दिवा-पनवेल मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. तसेच विठ्ठलवाडी बस डेपो आणि डोंबिवली बसस्थानकात कोरोना चाचणी केली जात नाही. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील आणि अन्य राज्यांतून शेतमाल घेऊन येणारे टेम्पो, ट्रकचालक व शेतमाल विक्रेते शेतकरी यांची कोरोना चाचणी केली जात नाही. रस्ते वाहतुकीद्वारे शहरात अनेक एण्ट्री पॉइंट आहेत. त्याठिकाणी चाचणी केली जात नाही.

------------

कल्याण रेल्वेस्थानक आणि बस डेपोत बाहेरगावांतून आलेल्या प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर घेऊन कोरोना चाचणी केली जाते. मात्र, त्यापैकी किती प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह होते, याचा तपशील प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्या गावातून कल्याण-डोंबिवलीत कोरोना दाखल होतो, हे सुस्पष्ट नाही. मात्र यूपी, बिहारमधून जास्त प्रवासी कल्याण, डोंबिवलीत येतात. त्याचबरोबर आंतरराज्य अहमदनगर, नाशिक, धुळे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, पुणे या ठिकाणांहून सरकारी व खाजगी बसने प्रवासी जास्त कल्याणच्या दिशेने प्रवास करतात.

-------------

पॉइंटर्स

एकूण कोरोना रुग्ण- ७८ हजार २८७

बरे झालेले रुग्ण- ६८ हजार ६३८

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण- ८ हजार ४२७

होम क्वारंटाइन झालेले एकूण रुग्ण- ४६ हजार ५९७

एकूण बळी- १ हजार २२२

------------------------

वाचली