शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सरिता दीक्षित लिखित ‘ध्येयसिद्धी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कळवा येथे संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 16:09 IST

मनोमय प्रकाशनच्या वतीने  ‘ध्येयसिद्धी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा श्री स्वामी समर्थ सभागृह, दत्तवाडी, खारीगाव येथे प्रसन्न वातावरणात संपन्न झाला. 

ठळक मुद्दे‘ध्येयसिद्धी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

ठाणे :  आपण पाहिलेलं स्वप्न आणि ठरवलेलं ध्येय कसं साध्य करावं ,याविषयी माहिती करून देणारं सरिता दत्ता दीक्षित लिखित ‘ध्येयसिद्धी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रसंगी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त नूतन बांदेकर, औद्योगिक प्रशिक्षक आणि मार्गदर्शक डॉ.शिवांगी झरकर,  संमोहनतज्ञ डॉ.मंगेश जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

      शालेय शिक्षण खूप कमी असूनही एक यशस्वी ज्योतिष ते प्रेरणादायी पुस्तकाच्या लेखिका हा प्रवास कसा झाला हा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला. “लहानपणी शाळेच्या पहिल्या दिवशी आवर्जून घेतला जाणारा कोऱ्या पुस्तकाचा सुगंध काही आर्थिक परिस्थितीमुळे कधीच घेता आला नाही. पण दिवस तसेच राहत नाहीत आणि आज ध्येयसिद्धी या पुस्तकाच्या कोऱ्या पानांचा सुगंध घेताना आनंदाश्रू आवरत नाहीत.” असे बोलताना लेखिकेसोबत सर्वांचे डोळे पाणावले. नूतन बांदेकर यांनी पुस्तकाची रूपरेषा थोडक्यात मांडली आणि अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. अशा चांगल्या कार्याची दखल सर्वांनी घ्यावी, पुस्तकातून आलेले विचार अंगी बाणवावे असे त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हटले.तसेच त्या पुढे म्हणाल्या की -लहान मुलं मातीच्या गोळ्यासारखी असतात,त्यांना आकार द्यावा तशी ती घडतात. संस्कार मुलांना घडवण्यासाठी खूप महत्वाचे असतात. आज शाळेत शिकवताना आता मोबाइल पासून मुलांना दूर कसं ठेवता येईल याच प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. मुलांच्या समुपदेशन करताना आईवडिलांनी अगोदर मुलांचे समुपदेशक व्हा असे सांगत उत्तम संस्कारांची आणि सुवचनांची तसेच प्रेरणादायी पुस्तकं मुलांना मराठी येत नाही म्हणून दुर्लक्षित करू नका त्यांना आवर्जून वाचून दाखवा त्यामुळे त्यांना पुस्तकांबरोबर मराठी भाषेचीही गोडी लागेल असे सांगितले.आत्मविश्वास आणि  इच्छाशक्ती जर असेल तर कोणतंही कार्य अवघड नाही मराठी मध्ये असे आत्मविश्वास पूर्ण कार्यक्रम आणि पुस्तकं यावीत आणि सर्व त्या पासून प्रेरित व्हावे आपलं जीवन अजून सार्थकी व्हावं यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत.समाजात अशी अनेक चांगली कामे होत असतात परंतु ती कधी पुढे येत नाहीत,लोकांपर्यंत पोहचत नाहीत.तर अशी कामे व्हावीत आणि ती लोकांपर्यंत पोहोचावीत,प्रकाशित व्हावीत. लोकांनाही चांगल्या गोष्टी हव्या असतात. डॉ मंगेश जोशी यांनी जीवनात संस्काराचं महत्व काय असतं याविषयी आपले मत व्यक्त केले. गेली २६ वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ.शिवांगी झरकर यांनी शिक्षणाचे महत्व सर्व वयोगटांसाठी कसे महत्वाचे आहे तसेच गरज आणि इच्छा यांतील फरक त्यांनी समर्पकतेने स्पष्ट केला. आधी ज्ञान कि आधी पुस्तक या विषयावर वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकत त्यांनी सर्वांची मने जिंकली. सुज्ञ वाचक आहेत म्हणून अशी पुस्तक प्रकाशित होतात अशी प्रतिक्रिया मनोमय प्रकाशनच्या मुग्धा दीक्षित आणि अश्विनी खाके यांनी दिली. या पुस्तकाच्या माध्यमातून या दोन तरुणी प्रकाशिका म्हणून प्रकाशन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई