शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

पगारासाठी धडपड, न्याय न मिळाल्याने पंतप्रधानांकडे तक्रार

By admin | Updated: February 1, 2017 03:17 IST

बदलापूरमधील इंपेरियल ग्रूपमध्ये काम करणाऱ्या अमित श्रीवास्तव या तरुणाचा कंपनीने आठ महिन्यांचा पगार थकविला आहे. हा पगार मिळावा यासाठी अमित हा दोन

बदलापूर : बदलापूरमधील इंपेरियल ग्रूपमध्ये काम करणाऱ्या अमित श्रीवास्तव या तरुणाचा कंपनीने आठ महिन्यांचा पगार थकविला आहे. हा पगार मिळावा यासाठी अमित हा दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे. मात्र त्याच्या तक्रारीची योग्य दखल पोलीस ठाणे, कामगार आयुक्त घेत नसल्याने या प्रकरणी त्याने थेट पंतप्रधानांना पत्राद्वारे तक्रार केली आहे. या प्रकरणी आपल्याला कोणीच न्याय देत नसल्याने जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला संघर्ष सुरुच राहील अशी ठाम भूमिका या तरुणाने घेतली आहे.बदलापूरमध्ये इंपेरियल ग्रूप नावाने टी.एल.शुक्ला हे कंपनी चालवतात. या ग्रूपच्या माध्यमातून बिल्डरांना बुकींग देण्याचे काम केले जात होते. ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे त्यांना बदलापूर आणि परिसरात घर दाखवून त्याचे बुकिंग करुन घेण्याचे काम केले जायचे. याच कंपनीत अमित हा दीड वर्षांपासून काम करत होता. सुरुवातीला पगार मिळण्यास विलंब होत होता. मात्र आठ महिन्यांपासून अमितकडून काम करुन घेतले जात होते. मात्र त्याचा मोबदला म्हणून पगार देण्यात येत नव्हता. मिळेल या आशेवर हा तरुण काम करत होता. मात्र आठ महिने उलटले तरी त्याला त्याचा हक्काचा पगार न मिळाल्याने त्याने कंपनीचे मालक शुक्ला यांच्याकडे पगारासाठी तकादा लावला. पगाराच्या रकमेपैकी काही रक्कम धनादेशाद्वारे त्याने देत अमितचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र धनादेशा वटण्या आधीच शुक्ला यांनी तो धनादेश थांबविला. चेक न वटवण्याच्या सूचना शुक्ला यांनी दिल्याने अमितला अर्धा पगारही मिळू शकला नाही. याबाबत त्याने जाब विचारला असता तुझ्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील अशा सूचना देण्यात आल्या. मात्र तरीही त्याचा पगार जमा झाला नाही. अखेर आपली फसवणूक केली जात असल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाद मागितली. तिथे त्याची अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मात्र न्याय मिळाला नाही किंवा शुक्ला यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. अखेर या प्रकरणी अमितने कामगार आयुक्तांकडे दाद मागितली. या संदर्भात तक्रार दिल्यावरही शुक्ला यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. कायद्यानुसार तक्रारी करुनही दाद मिळत नसल्याने अमितने २६ जानेवारीला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात त्याला आठ महिन्यांचा ४ लाख ५० हजार रुपये पगार आणि इतर सुविधा शुल्कांसह रक्कम येणे अपेक्षित आहे. या प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी त्याने या पत्रात केली आहे. आता पंतप्रधानांकडून या पत्राला काय प्रतिसाद मिळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी) कंपनीच्या मालकांशी संपर्कच नाही : दरम्यान, या प्रकरणी कंपनीचे मालक शुक्ला यांच्याकडे प्रतिक्रीया घेण्यासाठी गेले असता ते कार्यालयात उपलब्ध झाले नाही. मोेबाईलवरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.