शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पगारासाठी धडपड, न्याय न मिळाल्याने पंतप्रधानांकडे तक्रार

By admin | Updated: February 1, 2017 03:17 IST

बदलापूरमधील इंपेरियल ग्रूपमध्ये काम करणाऱ्या अमित श्रीवास्तव या तरुणाचा कंपनीने आठ महिन्यांचा पगार थकविला आहे. हा पगार मिळावा यासाठी अमित हा दोन

बदलापूर : बदलापूरमधील इंपेरियल ग्रूपमध्ये काम करणाऱ्या अमित श्रीवास्तव या तरुणाचा कंपनीने आठ महिन्यांचा पगार थकविला आहे. हा पगार मिळावा यासाठी अमित हा दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे. मात्र त्याच्या तक्रारीची योग्य दखल पोलीस ठाणे, कामगार आयुक्त घेत नसल्याने या प्रकरणी त्याने थेट पंतप्रधानांना पत्राद्वारे तक्रार केली आहे. या प्रकरणी आपल्याला कोणीच न्याय देत नसल्याने जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला संघर्ष सुरुच राहील अशी ठाम भूमिका या तरुणाने घेतली आहे.बदलापूरमध्ये इंपेरियल ग्रूप नावाने टी.एल.शुक्ला हे कंपनी चालवतात. या ग्रूपच्या माध्यमातून बिल्डरांना बुकींग देण्याचे काम केले जात होते. ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे त्यांना बदलापूर आणि परिसरात घर दाखवून त्याचे बुकिंग करुन घेण्याचे काम केले जायचे. याच कंपनीत अमित हा दीड वर्षांपासून काम करत होता. सुरुवातीला पगार मिळण्यास विलंब होत होता. मात्र आठ महिन्यांपासून अमितकडून काम करुन घेतले जात होते. मात्र त्याचा मोबदला म्हणून पगार देण्यात येत नव्हता. मिळेल या आशेवर हा तरुण काम करत होता. मात्र आठ महिने उलटले तरी त्याला त्याचा हक्काचा पगार न मिळाल्याने त्याने कंपनीचे मालक शुक्ला यांच्याकडे पगारासाठी तकादा लावला. पगाराच्या रकमेपैकी काही रक्कम धनादेशाद्वारे त्याने देत अमितचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र धनादेशा वटण्या आधीच शुक्ला यांनी तो धनादेश थांबविला. चेक न वटवण्याच्या सूचना शुक्ला यांनी दिल्याने अमितला अर्धा पगारही मिळू शकला नाही. याबाबत त्याने जाब विचारला असता तुझ्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील अशा सूचना देण्यात आल्या. मात्र तरीही त्याचा पगार जमा झाला नाही. अखेर आपली फसवणूक केली जात असल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाद मागितली. तिथे त्याची अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मात्र न्याय मिळाला नाही किंवा शुक्ला यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. अखेर या प्रकरणी अमितने कामगार आयुक्तांकडे दाद मागितली. या संदर्भात तक्रार दिल्यावरही शुक्ला यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. कायद्यानुसार तक्रारी करुनही दाद मिळत नसल्याने अमितने २६ जानेवारीला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात त्याला आठ महिन्यांचा ४ लाख ५० हजार रुपये पगार आणि इतर सुविधा शुल्कांसह रक्कम येणे अपेक्षित आहे. या प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी त्याने या पत्रात केली आहे. आता पंतप्रधानांकडून या पत्राला काय प्रतिसाद मिळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी) कंपनीच्या मालकांशी संपर्कच नाही : दरम्यान, या प्रकरणी कंपनीचे मालक शुक्ला यांच्याकडे प्रतिक्रीया घेण्यासाठी गेले असता ते कार्यालयात उपलब्ध झाले नाही. मोेबाईलवरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.