शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पगारासाठी धडपड, न्याय न मिळाल्याने पंतप्रधानांकडे तक्रार

By admin | Updated: February 1, 2017 03:17 IST

बदलापूरमधील इंपेरियल ग्रूपमध्ये काम करणाऱ्या अमित श्रीवास्तव या तरुणाचा कंपनीने आठ महिन्यांचा पगार थकविला आहे. हा पगार मिळावा यासाठी अमित हा दोन

बदलापूर : बदलापूरमधील इंपेरियल ग्रूपमध्ये काम करणाऱ्या अमित श्रीवास्तव या तरुणाचा कंपनीने आठ महिन्यांचा पगार थकविला आहे. हा पगार मिळावा यासाठी अमित हा दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे. मात्र त्याच्या तक्रारीची योग्य दखल पोलीस ठाणे, कामगार आयुक्त घेत नसल्याने या प्रकरणी त्याने थेट पंतप्रधानांना पत्राद्वारे तक्रार केली आहे. या प्रकरणी आपल्याला कोणीच न्याय देत नसल्याने जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला संघर्ष सुरुच राहील अशी ठाम भूमिका या तरुणाने घेतली आहे.बदलापूरमध्ये इंपेरियल ग्रूप नावाने टी.एल.शुक्ला हे कंपनी चालवतात. या ग्रूपच्या माध्यमातून बिल्डरांना बुकींग देण्याचे काम केले जात होते. ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे त्यांना बदलापूर आणि परिसरात घर दाखवून त्याचे बुकिंग करुन घेण्याचे काम केले जायचे. याच कंपनीत अमित हा दीड वर्षांपासून काम करत होता. सुरुवातीला पगार मिळण्यास विलंब होत होता. मात्र आठ महिन्यांपासून अमितकडून काम करुन घेतले जात होते. मात्र त्याचा मोबदला म्हणून पगार देण्यात येत नव्हता. मिळेल या आशेवर हा तरुण काम करत होता. मात्र आठ महिने उलटले तरी त्याला त्याचा हक्काचा पगार न मिळाल्याने त्याने कंपनीचे मालक शुक्ला यांच्याकडे पगारासाठी तकादा लावला. पगाराच्या रकमेपैकी काही रक्कम धनादेशाद्वारे त्याने देत अमितचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र धनादेशा वटण्या आधीच शुक्ला यांनी तो धनादेश थांबविला. चेक न वटवण्याच्या सूचना शुक्ला यांनी दिल्याने अमितला अर्धा पगारही मिळू शकला नाही. याबाबत त्याने जाब विचारला असता तुझ्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील अशा सूचना देण्यात आल्या. मात्र तरीही त्याचा पगार जमा झाला नाही. अखेर आपली फसवणूक केली जात असल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाद मागितली. तिथे त्याची अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मात्र न्याय मिळाला नाही किंवा शुक्ला यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. अखेर या प्रकरणी अमितने कामगार आयुक्तांकडे दाद मागितली. या संदर्भात तक्रार दिल्यावरही शुक्ला यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. कायद्यानुसार तक्रारी करुनही दाद मिळत नसल्याने अमितने २६ जानेवारीला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात त्याला आठ महिन्यांचा ४ लाख ५० हजार रुपये पगार आणि इतर सुविधा शुल्कांसह रक्कम येणे अपेक्षित आहे. या प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी त्याने या पत्रात केली आहे. आता पंतप्रधानांकडून या पत्राला काय प्रतिसाद मिळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी) कंपनीच्या मालकांशी संपर्कच नाही : दरम्यान, या प्रकरणी कंपनीचे मालक शुक्ला यांच्याकडे प्रतिक्रीया घेण्यासाठी गेले असता ते कार्यालयात उपलब्ध झाले नाही. मोेबाईलवरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.