शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गाडी पुलाचे काम कासवगतीने, एमएमआरडीएकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:21 IST

कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी पूल उभारण्याचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. मात्र, ते अजूनही पूर्ण झालेले नाही. पुलाच्या या कासवगतीमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार कधी, असा सवाल केला जात आहे.

कल्याण - कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी पूल उभारण्याचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. मात्र, ते अजूनही पूर्ण झालेले नाही. पुलाच्या या कासवगतीमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार कधी, असा सवाल केला जात आहे.कल्याण-भिवंडीला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन पूल हा वाहतुकीसाठी बंद आहे. त्याला लागूनच समांतर खाडीपूल बांधला गेला. मात्र, तो वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने पुलावर प्रचंड कोंडी होते. त्यामुळे या पुलाशेजारीच नवीन सहापदरी पूल उभारण्यास एमएमआरडीएने मंजुरी दिली. ७६ कोटी रुपयांचे हे काम सुप्रीम कंपनीला देण्यात आले. २५ मीटर रुंद आणि ३८ मीटर लांब असलेल्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ सप्टेंबरला झाले. पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन दीड वर्ष उलटले तरी प्रत्यक्षात कामाला अद्याप गती मिळालेली नाही. पुलाचे केवळ दोन ते तीन खांब खाडीत उभारले गेले आहेत. पुलाचे काम सुरू झाले, तेव्हा मेरीटाइम बोर्डाने पुलाचे आधारखांब खाडीत उभारण्यासाठी परवानगीचा मुद्दा उपस्थित केला होता. या परवानगीनंतर सुप्रीम कंपनीने कामाला सुरुवात केली. मात्र, काम संथगतीने सुरू आहे. याच गतीने काम सुरू राहिल्यास पुलाच्या उभारणीला आणखी दोन वर्षे लागतील, अशी शक्यता आहे.पुलाच्या संथगतीबद्दल शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी कंत्राटदाराविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या कंपनीला एमएमआरडीएने भिवंडीतील अन्य दोन उड्डाणपुलांचे काम दिलेले आहे. तेही संथगतीने सुरू असल्याची तेथील लोकप्रतिनिधींची ओरड आहे.चौकातील कोंडी फोडापत्रीपूल ते दुर्गाडीदरम्यान गोविंदवाडी बायपास रस्ता तयार करण्यात आला. मात्र, या मार्गाने येणारी वाहने दुर्गाडी चौकाला वळसा घालून खाडीपुलाकडे अथवा शहाड व कल्याण स्थानकाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. त्यामुळे दुर्गाडी चौकात कोंडी होती. ती टाळण्यासाठी बायपास रस्त्यावरून आलेली वाहने थेट कोनगावात जाण्यासाठी एक मार्ग तयार करावा.त्याचबरोबर स्टेशन ते दुर्गाडी असा एलिव्हेटेड मार्ग करावा. त्यामुळे कल्याण शिवाजी चौक आणि सहजानंद चौकातील वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होईल, अशी मागणी पाटील यांनी मदान यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणnewsबातम्या