शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाविरोधात मंडळाचीच तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:50 IST

खंबाळपाडा नाल्यातील प्रदूषण वाढत असल्याने बेकायदा प्लास्टिक पिशव्या, ड्रम धुवून ते वाढवणाºयांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने बडगा उगारला आहे

डोंबिवली : खंबाळपाडा नाल्यातील प्रदूषण वाढत असल्याने बेकायदा प्लास्टिक पिशव्या, ड्रम धुवून ते वाढवणाºयांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने बडगा उगारला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तसेच अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांसोबत कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांकडेही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.कांचनगाव खंबाळपाडा येथे मॉडेल कॉलेजच्या मागील बाजूला अजिउल्लाह खान याने भाड्याने जागा घेतली आहे. ही जागा चिंतामणी पाटील यांच्या मालकीची आहे. या जागेत खान हा प्लास्टिक पिशव्या, घनकचरा, रसायनांचे ड्रम अधिकृतपणे नाल्यालगत धुतो. त्यामुळे पिशव्या, ड्रममधील घातक रसायन व घनकचरा हा खंबाळपाडा नाल्याला जाऊन मिळतो. याशिवाय काही रासायनिक कचरा अनधिकृतपणे जाळला जातो. अशास्त्रीय पद्धतीने कचºयावर प्रक्रिया करण्याचा उद्योगच खान याने थाटला आहे. त्यामुळे वायू व जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेत खंबाळपाडा ते ठाकुर्ली परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. त्यामुळे खंबाळपाडा परिसरातील नागरिकांकडून प्रदूषणाच्या तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केल्या जातात. डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील फेज नंबर वनमध्ये सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरासमोर रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. या केंद्रातून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन दररोज १५ दशलक्ष लीटर पाणी खंबाळपाडा नाल्यात सोडले जाते. त्यानंतरही नागरिकांच्या प्रदूषणाच्या तक्रारी का येतात, त्याचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला. तेव्हा खान बेकायदेशीररित्या कचरा जाळून तसेच पिशव्या व ड्रम धूवून खंबाळपाडा नाला प्रदूषित करीत असल्याचे उघड झाले. पंधरा दिवसापूर्वीच खंबाळपाड्यात टँकरद्वारे बेकायदा रसायन सोडणाºया सह्याद्री कंपनीविरोधात बंदची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती. या कंपनीत मणी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन प्रक्रिया न करताच थेट नाल्यात सोडण्यात आले होते. कंपनीचा टँकरही जप्त केला होता. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रदूषण कायद्यान्वये संबंधितांविरोधात पोलीस गुन्हा दाखल करु शकतात. अवैध धंदे या कलमाखालीही गुन्हा दाखल होऊ शकतो. याशिवाय महापालिका अधिनियमात अवैध धंदे बंद करण्याची तरतूद आहे. या तरतुदीचा आधार घेऊन आयुक्त कारवाई करतात की नाही, हे आता महत्वाचे ठरेल.२००५ च्या अतिवृष्टीत पुराच्या वेळी वालधुनी नदीशेजारील बेकायदा भंगार दुकानांना टाळे ठोकण्याची कारवाई तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी केली होती.