शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीणमधील नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरले, तसेच शेतीचेही नुकसान झाले आहे. या सगळ्यांना सरकारने नुकसान ...

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीणमधील नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरले, तसेच शेतीचेही नुकसान झाले आहे. या सगळ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पाटील यांनी शुक्रवारी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. आडीवली ढोकळी परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे गुडघाभर पाणी शिरले होते, त्यामुळे त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू बुडाल्या. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खराब झाल्या. आधीच कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला असतानाच नागरिकांना जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. ज्या घरात पाणी शिरले होते, त्या घरांमध्ये रुग्ण होते. अनेकांनी कर्ज काढून घर घेतले आहे. हातात पैसा नाही, त्यामुळे घराचे कर्ज कसे फेडायचे, या सगळ्या विवंचनेत असलेल्या नागरिकांना आर्थिक भरपाई दिली गेली पाहिजे. कल्याण ग्रामीण भागातील भातशेतीलाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही भरपाई दिली गेली पाहिजे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. पाटील यांची मागणी सरकार दरबारी कळविली जाईल, असे आश्वासन तहसीलदारांनी त्यांना दिले आहे.

-------