शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीणमधील नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरले, तसेच शेतीचेही नुकसान झाले आहे. या सगळ्यांना सरकारने नुकसान ...

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीणमधील नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरले, तसेच शेतीचेही नुकसान झाले आहे. या सगळ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पाटील यांनी शुक्रवारी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. आडीवली ढोकळी परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे गुडघाभर पाणी शिरले होते, त्यामुळे त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू बुडाल्या. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खराब झाल्या. आधीच कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला असतानाच नागरिकांना जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. ज्या घरात पाणी शिरले होते, त्या घरांमध्ये रुग्ण होते. अनेकांनी कर्ज काढून घर घेतले आहे. हातात पैसा नाही, त्यामुळे घराचे कर्ज कसे फेडायचे, या सगळ्या विवंचनेत असलेल्या नागरिकांना आर्थिक भरपाई दिली गेली पाहिजे. कल्याण ग्रामीण भागातील भातशेतीलाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही भरपाई दिली गेली पाहिजे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. पाटील यांची मागणी सरकार दरबारी कळविली जाईल, असे आश्वासन तहसीलदारांनी त्यांना दिले आहे.

-------