शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
4
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
5
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
6
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
7
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
8
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
10
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
11
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
12
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
13
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
14
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
15
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
16
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
17
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
18
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
19
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
20
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा लाख रुपयांची भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:43 IST

ठाणे : मासुंदा तलावाजवळ वृक्ष कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेला महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कारणीभूत असून, मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा ...

ठाणे : मासुंदा तलावाजवळ वृक्ष कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेला महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कारणीभूत असून, मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. वर्षातून किमान दोनवेळा वृक्षांच्या फांद्यांची छाटणी आवश्यक असताना, वृक्ष प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

मासुंदा तलावाजवळ बुधवारी रात्री कोसळलेल्या वृक्षाखाली सापडून रिक्षाचालक अरविंद राजभर (वय २८, रा. रामनगर, वागळे इस्टेट व प्रवासी चंद्रकांत केशव पाटील (वय ५७, रा. रबाळे, नवी मुंबई) यांचा मृत्यू झाला. शहरातील बहुसंख्य रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाल्यामुळे झाडांच्या मुळांना पसरण्यास जागा राहत नाही, असा खुलासा केला जातो. त्यामुळे अशा वृक्षांचे वर्षातून दोनवेळा सर्वेक्षण करण्याची गरज आहे. त्यानंतर धोकादायक, महाकाय वृक्ष व धोकादायक वृक्षांच्या फांद्या वेळोवेळी कापण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे वृक्ष प्राधिकरणाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच मासुंदा तलावाजवळची दुर्घटना घडली, असा आरोप त्यांनी केला.

या दुर्घटनेला सर्वस्वी महापालिका व वृक्ष प्राधिकरण जबाबदार आहे. या दुर्घटनेत दोघांचा बळी गेल्यामुळे दोन कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी महापालिकेने स्वीकारून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चौकट

दोन दुर्घटनानंतरही

झोपी गेलेले वृक्ष प्राधिकरण!

ठाण्यात यापूर्वी वृक्ष कोसळून निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. २०१७ मध्ये पाचपाखाडीत वकील किशोर पवार यांचा झाडाखाली सापडून मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीला सहानुभूती म्हणून महापालिकेने नोकरी दिली. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये ठाणे स्टेशनजवळ ताडाचे झाड कोसळल्यामुळे दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतरही वृक्ष प्राधिकरण झोपी गेलेले आहे. त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याचा धोका आहे, असा आरोप वाघुले यांनी केला.

.........

वाचली