शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:40 IST

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाने ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहरांच्या किनारपट्टीवरील नागरिकांच्या घरांंसह शेती, भाजीपाला, उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या ...

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाने ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहरांच्या किनारपट्टीवरील नागरिकांच्या घरांंसह शेती, भाजीपाला, उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या बोटींचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना आवश्यक भरपाई मिळवून देण्यात यावी, यासाठी खासदार राजन विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन नुकसानीचा अहवाल त्यांना दिला आहे.

ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर ही शहरे बहुतांश खाडीकिनारी वसलेली आहेत. चक्रीवादळामुळे या खाडी किनारपट्टीवरील, भाईंदर पश्चिमेकडील उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या बोटीचे तसेच त्यांच्या राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. भाईंदर पश्चिम भागातील गावांमधील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठाणे घोडबंदर पट्ट्यातील कोलशेत, वाघबीळ, बाळकुम, कासारवडवली, मोगरपाडा, ओवळा, भाईंदरपाडा, नागले या गावातील शेती करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीकडे विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

नवी मुंबईतील खाडीकिनारी असलेल्या गावठाणातील व पामबीच मार्गावर, सानपाडा मोराज सर्कलजवळ विशाल नारळकर या तरुणाचा विद्युत पोल अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याला राज्य शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, असेही त्यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.

---------

गेल्या वर्षी चक्रीवादळादरम्यान उत्तनच्या मासेमारी हंगामात मासेमारी करता आली नाही, यासाठी राज्य शासनाने या मच्छीमारांना आर्थिक साहाय्य घोषित केले आहे. त्यामध्ये दोन हजार ८१४ लाभार्थ्यांना मच्छीमारनौका व मासळीविक्रेता महिलांना तीन कोटी ७० लाखांची मदत मिळवून दिली याबद्दल खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.

----------

* खासदार राजन विचारे यांनी मीरा भाईंदर शहरासाठी स्मशानभूमी व दफनभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे लावून धरली आहे.

---------