शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

उल्हासनगर कचरा कुंड्या मुक्त करण्याचा स्वच्छ उत्सव कार्यक्रमात आयुक्तांचा निर्धार

By सदानंद नाईक | Updated: April 2, 2023 20:26 IST

 उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

सदानंद नाईक उल्हासनगर : शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छ उत्सव कार्यक्रमात शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त अजीज शेख यांनी केला. यावेळी सामाजिक संस्था, गृहसंकुल, हॉटेल चालक आदींना कचरा इतरत्र फेकण्या ऐवजी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र घेण्याचे आवाहन केले.

उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी विभागाच्या वतीने स्वच्छ उत्सवाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला आयुक्त अजीज शेख, उपायुक्त सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहर स्वच्छ व सुंदर राहण्याच्या संकल्पनेतून कार्यक्रमाला हॉटेल चालक, गृहसंकुल पदाधिकारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, दुकानदार आदींना बोलाविण्यात आले होते. आयुक्त अजीज शेख यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून दुकानदार, हॉटेल चालक, गृहसंक आदींनी कचरा इतरत्र न फेकता घंटा कचरा गाडीत टाकण्याचे आवाहन केले. तसेच अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असून हॉटेल चालकासह इतरांनी कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र खरेदी केल्यास, कचऱ्याची जागीच विल्हेवाट लागून कचऱ्याचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे सांगितले. 

शहरात घंटा कचरा गाड्या प्रत्यक्ष परिसरात फिरत असून नागरिकांसह गृहसंकुल, हॉटेल चालकसह इतरांनी कचरा घंटा गाडीत टाकावा. टप्याटप्याने शहरातील कचरा कुंड्याचे खत्ते बंद करून, शहर कचरा कुंडया मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त अजीज शेख यांनी यावेळी बोलून दाखविला. महापालिका प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे खाजगीकरण करण्यात आले असून ठेकेदाराचे २७० कंत्राटी कामगार साफसफाई करीत आहेत. या साफसफाईच्या खाजगीकरणाला नागरिकांचा विरोध असलातरी, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ठेका देण्याला मंजुरी दिली होती. त्यामुळे माजी नगरसेवक, कामगार संघटना, राजकीय स्थानिक नेते यांची याबाबत बोलती बंद झाल्याचा आरोप होत आहे. 

सार्वजनिक शौचालयाची दैनावस्था महापालिका स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. तर दुसरीकडे अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचल्याचा आरोप होत आहे. तसेच वर्षाला कोट्यवधी रुपये खर्चूनही सार्वजनिक शौचालयाची दैनावस्था झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :ulhasnagar-acउल्हासनगर