शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
3
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
4
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
5
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
6
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
7
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
8
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
9
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
10
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
11
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
12
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
13
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
14
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
15
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
16
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
17
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
18
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
19
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
20
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक

अजेंड्यावरून आयुक्तांचा महापौरांना ठेंगा

By admin | Updated: June 17, 2016 02:13 IST

शहरातील काही महत्त्वांच्या विषयांच्या प्रकरणांना मंजुरी देण्याच्या मुद्यावरुन महापौर हे आयुक्तांकडे वारंवार विचारणा करीत असल्याची घटना ताजी असतांनाच, आता नियमाला डावलून अथवा

- अजित मांडके,  ठाणेशहरातील काही महत्त्वांच्या विषयांच्या प्रकरणांना मंजुरी देण्याच्या मुद्यावरुन महापौर हे आयुक्तांकडे वारंवार विचारणा करीत असल्याची घटना ताजी असतांनाच, आता नियमाला डावलून अथवा महापौरांशी कोणतीही चर्चा न करता आयुक्तांनी महासभेच्या अजेंड्यामध्ये घुसखोरी करून तब्बल २८ विषय परस्पर घातले. यामुळे गुरुवारी आयुक्त आणि महापौर यांच्याच चांगलीच खडाजंगी उडाली. यावरून सचिवांनादेखील महापौरांनी फैलावर घेतल्याची माहिती पालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. एकूणच या मुद्यावरुन महापौर प्रथमच आक्रमक झाले असून पुढे याचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महासभेचा अंजेडा तयार होत असताना कोणते विषय घ्यावेत कोणते घेऊ नयेत, याची चर्चा प्रथम महापौरांकडे होते. महापौरांनी जर एखाद्या विषयाबाबत आक्षेप घेतला तर तो विषय मागे ठेवला जातो. परंतु, मागील काही महिन्यांपासून महापालिका स्वत:च काही विषय अजेंड्यात घालत होती. त्यामुळे महापौरांचा काहीसा नाराजीचा सूर होता. परंतु, आता प्रशासनाने अतीच केल्याची बाब या महासभेच्या निमित्ताने समोर आली आहे. महासभेचा अजेंडा जेव्हा अंतिम झाला तेव्हा पटलावर महापौरांनी जे विषय अंतिम केले होते, तेच पटलावर घेतले होते. त्यानुसार पटलावर सुमारे २३ विषयच होते. परंतु दोनच दिवसात यामध्ये अधिकच्या २८ विषयांची भर पडून हा अजेंडा ५१ विषयांवर गेला. मिळालेल्या माहितीनुसार महापौरांनी अंजेडा अंतिम केल्यानंतर तो पुन्हा आयुक्तांना दाखविला आणि येथेच आयुक्तांनी थेट २८ विषय घुसविल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर महापौरांच्या टेबलावर ठेवला. परंतु त्यात वाढ कशी झाली असा सवाल उपस्थित करुन महापौरांनी सचिव विभागाला धारेवर धरले आहे. तसेच आयुक्तांबरोबरही बाचाबाची झाल्याची चर्चा आता पालिका वर्तुळात सुरु झाली आहे. या संदर्भात महापौर संजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)काय आहेत, ते अधिकचे विषयमहापौरांनी अजेंडा अंतिम केल्यानंतर आयुक्तांनी महासभेतील घोषवाऱ्यात १०८ क्रमांकापासून ते १३५ क्रमांकपर्यंतचे विषय घातले आहेत. यामध्ये मुक बधीर बालकांवर प्राथमिक अवस्थेत कॉकलिअर इप्लांट शस्त्रक्रिया, खाडीचे पाणी पिण्यायोग्य करणे, खाडीपात्रात जलविद्युत प्रकल्प उभारणे, आकाशगंगा सोसायटी, राबोडी येथील नाल्यावरील जुना पुल तोडून नवा बांधणे, मासुंदा तलाव, ब्रम्हांळा तलाव, सिद्धेश्वर तलाव, मदार्डे कोलबाड तलावांचे सुशोभीकरण, नितिन कंपनी ते रमाबाई आंबेडकर उद्यानापर्यंत सर्व्हिस रोडचे नुतणीकरण, कळव्यातील प्रभाग क्र. ४३ मध्ये बसडेपो विकसित करणे, एलबीएस मार्गावरील तीनहातनाका ते मुलुंड चेकनाका पर्यंत रस्ता रुंदीकरण, महापालिका शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजन, तसेच इतर प्रभागातील रस्त्यांची डागडुजी, नव्याने रस्ते विकसित करणे उपवन तलाव येथे बनारस घाट आणि अ‍ॅम्पी थिएटरची निर्मिती आदी विषयांचा यात समावेश आहे.अजेंड्याचा नियम काय सांगतो?नियमानुसार एकदा महापौरांनी अंजेडा अंतिम केल्यानंतर प्रशासनाला कोणत्याही प्रकारे विषय टाकता येऊ शकत नाहीत. किंबहुना विषय टाकायचेच असतील तर, त्यासाठी महापौरांची परवानगी घेणे आवश्यक असते, किंवा त्यांच्याशी चर्चा करुनच ते विषय टाकता येऊ शकतात. परंतु, याबाबतीत जयस्वाल यानी महापौरांना अंधारात ठेवले आहे.