शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

आयुक्तच होणार तिकीट तपासनीस

By admin | Updated: July 11, 2015 03:27 IST

ठाणे परिवहन सेवेतील ३५ टीसींकडून महिन्याला केवळ १२०० रुपये दंडाची वसुली होत असल्याची बाब शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेतील ३५ टीसींकडून महिन्याला केवळ १२०० रुपये दंडाची वसुली होत असल्याची बाब शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. प्रत्येक टीसीला टार्गेट दिले जात असतानाही ते कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. विशेष म्हणजे ते काम करीत नसल्याचे प्रशासनानेही मान्य केले आहे. त्यामुळेच आता त्यांना कामाला लावा, वेळ पडल्यास मीसुद्धा महिन्यातून एकदा प्रवाशांची तिकिटे तपासण्याचे काम करण्यास तयार असल्याची माहिती प्रभारी आयुक्त अशोक रणखांब यांनी दिली. परंतु, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अकाउंट विभागातील कर्मचाऱ्यांनीही अशा प्रकारे तिकीट तपासण्याचे काम करून परिवहनचे उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा, असेही खडेबोल त्यांनी परिवहन व्यवस्थापकांना सुनावले.मुंब्रा, रेतीबंदरची परिवहन सेवा बंद का केली, बसथांब्यांचे काम का रखडले, असे सवाल शिवसेनेचे नगरसेवक बालाजी काकडे यांनी, तर आगारातून शुक्रवारी किती बस निघाल्या, असा सवाल नजीब मुल्ला यांनी केला. त्यावर माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिले. गुरुवारी किती बस आगारातून निघाल्या, याची माहिती मागितली असता १९९ बस रस्त्यावर धावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी १४३ बस रस्त्यावर धावल्याचा गौप्यस्फोट करून मुल्ला यांनी त्यांना तोंडघशी पाडले. परिवहनमधून किती बस बाहेर पडतात, याचीच माहिती व्यवस्थापकांना नसल्याचे या वेळी उघड झाले. एकाच बसची वारंवार दुरुस्ती करून पैशांचा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. केडीएमटी, नवी मुंबई आणि वसई-विरार महापालिकांच्या बस ठाण्यात उत्पन्न मिळवत आहेत. परंतु, ठाणे परिवहन सेवा ठाण्याबाहेर जाण्यास का तयार नाही, असा सवाल सुधीर भगत यांनी उपस्थित केला.परिवहनमध्ये ३५ टीसी असून त्यांच्याकडून महिनाकाठी केवळ १२०० रुपयांचाच दंड वसूल होत असल्याचा मुद्दा रामभाऊ तायडे यांनी उपस्थित केला. यावर प्रत्येकाला महिन्याला १५ केसेसचे टार्गेट दिले असून ते वाढवून २० केले होते. परंतु, कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. त्यामुळे सदस्य आक्रमक झाल्याने अखेर प्रभारी आयुक्तांनी त्यांना कामाला लावा, अन्यथा त्यातील कामचुकार टीसी कमी करा, असे आदेश त्यांनी दिले. याशिवाय, मुंब्रा रेतीबंदर बस उद्यापासून सुरू होईल. (प्रतिनिधी)