शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उत्तन समुद्र किनारा स्वच्छतेसाठी तरुणांसोबत आयुक्त सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रकिनारी काही महिने स्वच्छता अभियान राबविणाऱ्या ‘फोर फ्यूचर इंडिया’ या संस्थेच्या मोहिमेत रविवारी ...

मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रकिनारी काही महिने स्वच्छता अभियान राबविणाऱ्या ‘फोर फ्यूचर इंडिया’ या संस्थेच्या मोहिमेत रविवारी मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले सहभागी झाले. हा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी यापुढे महापालिकाही सक्रिय सहभाग घेणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

उत्तन येथील वेलंकनी तीर्थ मंदिरालगत असलेला समुद्रकिनारा हा शहरातील नागरिकांसाठी पर्यटन व विरंगुळ्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेली सोनेरी वाळू पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणारे मद्यपी दारूच्या बाटल्या येथेच फोडतात वा टाकून जातात. त्यामुळे काचेचे तुकडे सर्वत्र पडलेले आढळतात. यामुळे येथे फिरण्यासाठी येणाऱ्या लहान-मोठ्यांचा पाय कापूर इजा हाेण्याचा धाेका असताे. कचरापेट्यांचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने बेशिस्त लोक कचरा उघड्यावर टाकतात. याशिवाय भरतीच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात कपडे, प्लास्टिक आदी कचरा वाहून किनारी येतो. हा कचरा वाळूत अडकून पडतो. त्यामुळे सुंदर निसर्गरम्य, सोनेरी वाळूचा हा किनारा अस्वच्छतेच्या जाळ्यात अडकलेला आहे. शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुणांच्या फोर फ्यूचर इंडिया या संस्थेतर्फे सात ते आठ महिन्यांपासून नियमित शनिवार, रविवारी हा किनारा साफ करण्यात येत आहे. शनिवारी या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे सहभागी झाले होते.

अनेक महिने नियमित राबवीत असणाऱ्या या उपक्रमाची प्रशंसा करीत उपक्रम सुरू करणाऱ्या हर्षद ढगे, सिद्धेश कांबळे, भावेश सुतार, पराग जाधव, साक्षी गुप्ता आदी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांना आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत या संस्थेकडून उत्तन, जुहू, दानापाणी, खारदांडा, गोराई, अर्नाळा, मनोरी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.

-----

समुद्रकिनारी कचरा करणाऱ्यांना दंड

पर्यावरण व पर्यटनाच्या दृष्टीने वेलंकनी समुद्रकिनाऱ्यावर कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी जनजागृतीचे फलक व कचऱ्याच्या डब्याचे नियोजन करण्यात येईल. समुद्रकिनाऱ्यावर कचरा करणाऱ्यांवर कायद्यानुसार दंड ठोठावण्यात येईल. उत्तन येथे भविष्यात होणाऱ्या सर्व स्वच्छता मोहिमेस महापालिकेकडून पूर्णपणे मदत केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.