शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन समुद्र किनारा स्वच्छतेसाठी तरुणांसोबत आयुक्त सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रकिनारी काही महिने स्वच्छता अभियान राबविणाऱ्या ‘फोर फ्यूचर इंडिया’ या संस्थेच्या मोहिमेत रविवारी ...

मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रकिनारी काही महिने स्वच्छता अभियान राबविणाऱ्या ‘फोर फ्यूचर इंडिया’ या संस्थेच्या मोहिमेत रविवारी मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले सहभागी झाले. हा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी यापुढे महापालिकाही सक्रिय सहभाग घेणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

उत्तन येथील वेलंकनी तीर्थ मंदिरालगत असलेला समुद्रकिनारा हा शहरातील नागरिकांसाठी पर्यटन व विरंगुळ्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेली सोनेरी वाळू पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणारे मद्यपी दारूच्या बाटल्या येथेच फोडतात वा टाकून जातात. त्यामुळे काचेचे तुकडे सर्वत्र पडलेले आढळतात. यामुळे येथे फिरण्यासाठी येणाऱ्या लहान-मोठ्यांचा पाय कापूर इजा हाेण्याचा धाेका असताे. कचरापेट्यांचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने बेशिस्त लोक कचरा उघड्यावर टाकतात. याशिवाय भरतीच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात कपडे, प्लास्टिक आदी कचरा वाहून किनारी येतो. हा कचरा वाळूत अडकून पडतो. त्यामुळे सुंदर निसर्गरम्य, सोनेरी वाळूचा हा किनारा अस्वच्छतेच्या जाळ्यात अडकलेला आहे. शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुणांच्या फोर फ्यूचर इंडिया या संस्थेतर्फे सात ते आठ महिन्यांपासून नियमित शनिवार, रविवारी हा किनारा साफ करण्यात येत आहे. शनिवारी या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे सहभागी झाले होते.

अनेक महिने नियमित राबवीत असणाऱ्या या उपक्रमाची प्रशंसा करीत उपक्रम सुरू करणाऱ्या हर्षद ढगे, सिद्धेश कांबळे, भावेश सुतार, पराग जाधव, साक्षी गुप्ता आदी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांना आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत या संस्थेकडून उत्तन, जुहू, दानापाणी, खारदांडा, गोराई, अर्नाळा, मनोरी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.

-----

समुद्रकिनारी कचरा करणाऱ्यांना दंड

पर्यावरण व पर्यटनाच्या दृष्टीने वेलंकनी समुद्रकिनाऱ्यावर कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी जनजागृतीचे फलक व कचऱ्याच्या डब्याचे नियोजन करण्यात येईल. समुद्रकिनाऱ्यावर कचरा करणाऱ्यांवर कायद्यानुसार दंड ठोठावण्यात येईल. उत्तन येथे भविष्यात होणाऱ्या सर्व स्वच्छता मोहिमेस महापालिकेकडून पूर्णपणे मदत केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.