शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

आयुक्तसाहेब, उल्हासनगरातील मृत्यू दराकडे लक्ष द्या, परिस्थिती भयाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 15:44 IST

ज्या नागरिकांचा स्वाब टेस्ट येण्यापूर्वी मृत्यू होतो. यांची मृत्यू नंतर स्वाब चाचणी घेतली जात नाही

ठळक मुद्दे ज्या नागरिकांचा स्वाब टेस्ट येण्यापूर्वी मृत्यू होतो. यांची मृत्यू नंतर स्वाब चाचणी घेतली जात नाही शहरातील शांतीनगर स्मशानभूमित ७ जुलै रोजी एकुण १० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले होते

उल्हासनगर : कोरोना स्वाब अहवाला पूर्वी संशयीत रूग्णाच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असून आयुक्तांनी शहरातील एकूण मृत्यू दर विचारात घ्यावा. अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांसह समाजसेवक व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे. उल्हासनगरात एकूण कोरोनाबाधित रुग्णाची संख्या ३६०० पेक्षा जास्त झाली असून रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांचे हेळसांड होत आहे. कोरोना संसर्गाने आतापर्यंत एकूण ६२ जणांचा मृत्यु झाला. असा आकडा महापालिका प्रशासनाने जाहीर केला. प्रत्यक्षात स्मशानभूमीत संशयित मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा मोठा असून स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटींग लागल्याची परिस्थिती आहे. असे मत समाजसेवक शिवाजी रगडे यांनी व्यक्त केले असून एकूण मृत्यू दराकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे, असे सुचविले आहे. 

ज्या नागरिकांचा स्वाब टेस्ट येण्यापूर्वी मृत्यू होतो. यांची मृत्यू नंतर स्वाब चाचणी घेतली जात नाही. त्यामुळे तो निगेटिव्ह आहे की, पोजिटीव्ह हे उघड होत नसल्याचे शिवाजी रगडे यांचे म्हणणे आहे. अशा संशयित मयत व्यक्तीच्या घरातील सदस्यांची स्वाब चाचणी केली जात नसल्याने, कोरोना संसर्ग कुटुंबासह इतरांना होण्याची भीती व्यक्त होत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात शहरात मृत्यू होत आहेत, स्मशानभूमीतील मृत्युचे रेकॉर्ड तपासले असता. गेल्या वर्षीपेक्षा जास्त मृत्यू, यावर्षीच्या रेकॉर्ड वहीमध्ये नोंदविल्यांचे उघड होते. तरीही झालेले मृत्यू हे कोरोना संसर्गाने झाले की नाही? याची दखल महापालिकेने घ्यायला हवी. असे मत व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक छटलानी यांनी व्यक्त केले. तसेच घरी होम क्वारंटाईन केलेले रुग्ण महापालिका व डॉक्टरांनी दिलेले नियम पाळत नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील इतरांना संसर्ग होत असल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे महापालिका आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नाकर्त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटींग 

शहरातील शांतीनगर स्मशानभूमित ७ जुलै रोजी एकुण १० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले होते. त्यापैकी किती संशयित कोरोना रुग्ण होते. संशयित रुग्ण असतील तर त्यांचा तपासणी साठी कोरोना स्वाब घेतला का? आदी अनेक प्रश्न निर्माण होत असून इतर स्मशानभूमीची अशीच भयाण परिस्थिति आहे. असे मत शिवाजी रगडे यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याulhasnagarउल्हासनगरthaneठाणे