शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

आयुक्त गैरहजर; महिला संतप्त

By admin | Updated: February 16, 2017 02:02 IST

केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीसमस्येला जबाबदार कोण, असा सवाल नांदिवली येथील त्रस्त रहिवाशांनी केला. केडीएमसी

डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीसमस्येला जबाबदार कोण, असा सवाल नांदिवली येथील त्रस्त रहिवाशांनी केला. केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन बुधवारी नांदिवलीचा पाहणी दौरा करणार होते. परंतु, ऐनवेळी तो त्यांना रद्द करावा लागल्याने महिला संतप्त झाल्या. रवींद्रन यांनी पळपुटेपणा का केला, असा सवाल करताना त्यांनी नगरसेविका प्रेमा म्हात्रे व शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांना घेराव घातला.नांदिवली परिसरातील पाणीटंचाईबाबत रहिवाशांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी रवींद्रन यांनी नगरसेविका म्हात्रेंच्या मागणीनुसार बुधवारी सकाळी १० वाजता पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यानुसार, रवींद्रन यांचे स्वागत तसेच त्यांना समस्या सांगण्यासाठी नागरिक जमले होते. मात्र, ११.३० नंतरही आयुक्त आले नाहीत. त्यामुळे रहिवासी संतापले. म्हात्रे यांनी आयुक्तांच्या कार्यालयाशी संपर्क साधला, तेव्हा रवींद्रन अचानक एमएमआरडीएच्या बैठकीला गेले आहेत. २३ फेब्रुवारीनंतर पाहणी दौरा करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे म्हात्रे यांनी आयुक्तांशी बोलून खात्रीही केली. मात्र, जमावाला शांत करताना नगरसेविका म्हात्रे व शाखाप्रमुख धनंजय म्हात्रे यांच्या नाकीनऊ आले. रवींद्रन यांच्यासह महापालिका प्रशासनाच्या या पळपुट्या धोरणाचा जमावाने निषेध केला. २३ फेब्रुवारीला आयुक्त न आल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)