शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

ब्रह्मांड कट्ट्यावर रंगला सप्तरंगी भावनांचा स्वराविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ आणि या जीवनात रंग भरते ते भावभावनांचे सप्तरंगी इंद्रधनुष्य! प्रेम, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ आणि या जीवनात रंग भरते ते भावभावनांचे सप्तरंगी इंद्रधनुष्य! प्रेम, मैत्री, चैतन्य, उत्कंठा, लाडीगोडी, विरह या व अशा अनेक भावनांनी नटलेला स्वराविष्कार ‘ब्रह्मांड कट्ट्या’च्या ‘सतरंगी रे!’ या कार्यक्रमात कलाकारांनी सादर केला. गायनाबरोबरच नृत्य व अदाकारीने या कार्यक्रमास चार चांद लावले.

ब्रह्मांड कट्ट्यातर्फे ‘सतरंगी रे’ हा बहारदार गाण्यांचा कार्यक्रम रविवारी ऑनलाइनद्वारे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ऋजुता देशपांडे यांच्या गणेश स्तवनाने झाली. वर्षा गंद्रे यांच्या ‘रोज रोज डाली डाली’ या यमन रागातील मधुर गीताने वातावरण ताजे केले. त्यानंतर ‘बाहो मे चले आओ’ या ऋजुता यांच्या सुमधुर सादेने रसिकांच्या हृदयाला हात घातला.

‘कितिदा नव्याने तुला आठवावे’ हे गीत विद्या जोशी यांनी, तर नीलेश महाडिक यांनी ‘अब तेरे बिन’, डॉ. अविनाश जोशी यांनी ‘ओ हंसिनी' आदी गाणी सादर केली. वर्षा व नीलेश यांच्या ‘गोमू संगतीनं’ व ‘हवा के साथ साथ’ या गाण्यांनी रंगत आणली. नीलेश व अविनाश यांचे ‘ये दोस्ती’ मैत्रीचा रंग उधळून गेले. डॉ. अविनाश व विद्या यांच्या ‘तुझे देखा तो ये जाना सनम’, ‘गली गली मे फिरता हैं’ या द्वंद्वगीताने रसिकांना पावले थिरकण्यास भाग पाडले. ‘ही नवरी असली’ हे गीत नीलेश व ऋजुता यांनी सादर केले, तसेच विद्या यांचे ‘रूपेरी वाळूत’, डॉ. अविनाश यांचे ‘निले निले अंबर पर’, नीलेश यांचे ‘जिंदगी एक सफर’ या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘जिंदगी मिल के बिताएंगे’ या समूहगीताने भावभावनांच्या सप्तरंगी सोहळ्याची सांगता केली. कार्यक्रमाचे निवेदन पूनम रेडेकर यांनी

केले.

---------------------