शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

खाण्यास अयोग्य बर्फ होणार रंगरंगिला

By admin | Updated: May 11, 2017 01:55 IST

खाण्यास योग्य नसलेल्या बर्फावर एकीकडे करडी नजर ठेवून तो सहज ओळखता यावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अनोखा फंडा शोधला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : खाण्यास योग्य नसलेल्या बर्फावर एकीकडे करडी नजर ठेवून तो सहज ओळखता यावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अनोखा फंडा शोधला आहे. यानुसार, त्या बर्फात कोणताही रंग टाकून त्याला रंगीबेरंगी करण्याच्या सूचना ते फॅक्टरीचालकांना करणार आहेत. त्यामुळे खाण्यास अयोग्य असलेला बर्फ आता रंगरंगिला होणार आहे. याबाबत, लवकरच ठाणे जिल्ह्यातील बर्फ फॅक्टरीचालकांची बैठक बोलावून त्यांना सूचना करणार असल्याचे एफडीए सूत्रांनी सांगितले.ऐन उन्हाळ्यात मुंबईत ग्रॅस्टो साथ पसरल्याने ठाणे अन्न व औषध प्रशासनाने ठाणे-पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ९ दिवसांत सुमारे १०२ ठिकाणी तपासणी करून खाण्यास अयोग्य असलेला जवळपास २१ हजार किलो बर्फ नष्ट केला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी याबाबत ३ मे रोजी तातडीची बैठक बोलवली होती. त्या वेळी खाण्यास योग्य नसलेल्या बर्फाबाबत त्यांनी काही सूचना केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.ठाणे जिल्ह्यात जवळपास ४० ते ४५ बर्फाची निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीज आहेत. त्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारे बर्फ तयार केला जातो. यामध्ये ६ फॅक्टरीतखाण्यास योग्य असलेला, तर उर्वरित फॅक्टरीतखाण्यास अयोग्य असलेला बर्फ तयार केला जात आहे. खाद्य दर्जाचा असलेला बर्फ हा बार, हॉटेल्स आदी ठिकाणी नाही तर, तो मासळीची साठवणूक करण्यासाठीही वापरतात. तर, खाण्यास अयोग्य बर्फ जर मासळी साठवणुकीसाठी वापरल्यास त्यातील जिवाणू त्या मासळीत जाऊन ते घातक ठरू शकतात. त्यामुळे वेळीच खबरदारी म्हणून फॅक्टरीचालकांना याबाबत त्याचे परिणाम गांभीर्याने निदर्शनास आणून देण्यासाठी बर्फामध्ये रंगाचा वापर करण्याचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. याबाबत, माहिती देण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यातील बर्फ फॅक्टरीचालकांची बैठक बोलवली आहे. त्या वेळी यापुढे खाण्यास अयोग्य असलेला बर्फ तयार करताना, प्रामुख्याने त्यामध्ये रंगाचा वापर केल्यास तो सर्वांनाच सहजतेने ओळखता येईल, हा यामागचा उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.