शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

रंगात रंगणार पण भिजणार नाही

By admin | Updated: March 22, 2016 02:22 IST

डोंबिवली पश्चिमेकडील जयमनीषा, तुलसी साई विहार, टाटा पॉवर लाइन येथील जय साई सागर, कल्याण येथील देशमुख होम्स अशा एक ना अनेक सोसायट्यांनी यंदा एकतर

जान्हवी मोर्ये,  डोंबिवलीडोंबिवली पश्चिमेकडील जयमनीषा, तुलसी साई विहार, टाटा पॉवर लाइन येथील जय साई सागर, कल्याण येथील देशमुख होम्स अशा एक ना अनेक सोसायट्यांनी यंदा एकतर धुळवडीत सहभागी व्हायचे नाही किंवा रंग खेळताना निदान पाण्याचा वापर करायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. सध्या भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अधिकाधिक सोसायट्या त्यांचेच अनुकरण करतील, अशी आशा आहे. पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील काही नागरी सहकारी सोसायट्यांनी बिनपाण्याने धूळवड साजरी करण्याचा निर्धार केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील ‘जयमनीषा’ सोसायटीचे सचिव गणपत सावंत यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून आमच्या सोसायटीत विविध सण-उत्सव एकत्र साजरे केले जातात. त्यात होळीसुद्धा साजरी करतो. धूळवड हा तर सर्वांच्या आवडीचा व आनंदाचा सण आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई पाहता आमच्या सोसायटीतील रहिवासी धुळवडीत पाण्याचा वापर करणार नाही. केवळ रंग एकमेकांना लावून आम्ही सण साजरा करणार आहोत. बुधवारी होळीपूजनाचा कार्यक्रम होईल, पण धुळवडीला पाण्याचा वापर करायचा नाही, असा ठरावच सोसायटीच्या बैठकीत आम्ही केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील तुलसी साई विहार सोसायटीचे अध्यक्ष अनिल भोईर यांनी सांगितले की, इमारतीत पाण्याचा साठा बऱ्यापैकी आहे. बोअरवेलचे पाणी आम्ही इतर कामांसाठी वापरतो. इमारतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. इमारतीच्या नळाला अर्धा तास पाणी येते. पाण्याचे नियोजन आमच्याकडे असले तरी आम्ही पाण्याचा जपून वापर करीत आहोत. पाणी असले तरीही यंदा आम्ही धुळवडीला पाण्याचा वापर करणार नाही. थोड्या प्रमाणात रंगाचा वापर करून उत्सव साजरा केला जाणार आहे. टाटा पॉवर लाइनजवळील जयसाई सागर इमारतीचे सरचिटणीस शिवशंकर प्रजापती यांनी सांगितले की, आमच्या इमारतीत नळाला दोन ते तीन दिवसांनी पाणी येते. इमारतीतील रहिवाशांना पाण्यासाठी १८०० रुपये खर्च करून टँकर मागवावा लागतो. घरकामासाठी इतर ठिकाणांहून पाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत धुळवडीकरिता पाण्याचा वापर कसा करणार. त्यामुळे आमच्या सोसायटीत यंदा रंग खेळणार नाही. केवळ रंगाचा टिळा कपाळावर लावून सण साजरा केला जाणार आहे. कल्याण पूर्वेकडील देशमुख होम्सचे अमरसेन चव्हाण यांनी सांगितले की, त्यांच्या सोसायटीत एक हजार नागरिकांची वस्ती आहे. १७ फेब्रुवारीपासून सोसायटीच्या नळाला पाणीच आलेले नाही. सोसायटी मोठी असल्याने कोट्यवधींची पाणीबिले आम्हाला पाठवली गेली आहेत. बिले येतात, पाणी मात्र येत नाही. त्यामुळे यंदा धुळवडीला पाणी आणि रंग खेळायचे नाहीत, हे ठरले आहे.