शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

रंगात रंगणार पण भिजणार नाही

By admin | Updated: March 22, 2016 02:22 IST

डोंबिवली पश्चिमेकडील जयमनीषा, तुलसी साई विहार, टाटा पॉवर लाइन येथील जय साई सागर, कल्याण येथील देशमुख होम्स अशा एक ना अनेक सोसायट्यांनी यंदा एकतर

जान्हवी मोर्ये,  डोंबिवलीडोंबिवली पश्चिमेकडील जयमनीषा, तुलसी साई विहार, टाटा पॉवर लाइन येथील जय साई सागर, कल्याण येथील देशमुख होम्स अशा एक ना अनेक सोसायट्यांनी यंदा एकतर धुळवडीत सहभागी व्हायचे नाही किंवा रंग खेळताना निदान पाण्याचा वापर करायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. सध्या भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अधिकाधिक सोसायट्या त्यांचेच अनुकरण करतील, अशी आशा आहे. पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील काही नागरी सहकारी सोसायट्यांनी बिनपाण्याने धूळवड साजरी करण्याचा निर्धार केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील ‘जयमनीषा’ सोसायटीचे सचिव गणपत सावंत यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून आमच्या सोसायटीत विविध सण-उत्सव एकत्र साजरे केले जातात. त्यात होळीसुद्धा साजरी करतो. धूळवड हा तर सर्वांच्या आवडीचा व आनंदाचा सण आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई पाहता आमच्या सोसायटीतील रहिवासी धुळवडीत पाण्याचा वापर करणार नाही. केवळ रंग एकमेकांना लावून आम्ही सण साजरा करणार आहोत. बुधवारी होळीपूजनाचा कार्यक्रम होईल, पण धुळवडीला पाण्याचा वापर करायचा नाही, असा ठरावच सोसायटीच्या बैठकीत आम्ही केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील तुलसी साई विहार सोसायटीचे अध्यक्ष अनिल भोईर यांनी सांगितले की, इमारतीत पाण्याचा साठा बऱ्यापैकी आहे. बोअरवेलचे पाणी आम्ही इतर कामांसाठी वापरतो. इमारतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. इमारतीच्या नळाला अर्धा तास पाणी येते. पाण्याचे नियोजन आमच्याकडे असले तरी आम्ही पाण्याचा जपून वापर करीत आहोत. पाणी असले तरीही यंदा आम्ही धुळवडीला पाण्याचा वापर करणार नाही. थोड्या प्रमाणात रंगाचा वापर करून उत्सव साजरा केला जाणार आहे. टाटा पॉवर लाइनजवळील जयसाई सागर इमारतीचे सरचिटणीस शिवशंकर प्रजापती यांनी सांगितले की, आमच्या इमारतीत नळाला दोन ते तीन दिवसांनी पाणी येते. इमारतीतील रहिवाशांना पाण्यासाठी १८०० रुपये खर्च करून टँकर मागवावा लागतो. घरकामासाठी इतर ठिकाणांहून पाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत धुळवडीकरिता पाण्याचा वापर कसा करणार. त्यामुळे आमच्या सोसायटीत यंदा रंग खेळणार नाही. केवळ रंगाचा टिळा कपाळावर लावून सण साजरा केला जाणार आहे. कल्याण पूर्वेकडील देशमुख होम्सचे अमरसेन चव्हाण यांनी सांगितले की, त्यांच्या सोसायटीत एक हजार नागरिकांची वस्ती आहे. १७ फेब्रुवारीपासून सोसायटीच्या नळाला पाणीच आलेले नाही. सोसायटी मोठी असल्याने कोट्यवधींची पाणीबिले आम्हाला पाठवली गेली आहेत. बिले येतात, पाणी मात्र येत नाही. त्यामुळे यंदा धुळवडीला पाणी आणि रंग खेळायचे नाहीत, हे ठरले आहे.