शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

रंगात रंगणार पण भिजणार नाही

By admin | Updated: March 22, 2016 02:22 IST

डोंबिवली पश्चिमेकडील जयमनीषा, तुलसी साई विहार, टाटा पॉवर लाइन येथील जय साई सागर, कल्याण येथील देशमुख होम्स अशा एक ना अनेक सोसायट्यांनी यंदा एकतर

जान्हवी मोर्ये,  डोंबिवलीडोंबिवली पश्चिमेकडील जयमनीषा, तुलसी साई विहार, टाटा पॉवर लाइन येथील जय साई सागर, कल्याण येथील देशमुख होम्स अशा एक ना अनेक सोसायट्यांनी यंदा एकतर धुळवडीत सहभागी व्हायचे नाही किंवा रंग खेळताना निदान पाण्याचा वापर करायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. सध्या भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अधिकाधिक सोसायट्या त्यांचेच अनुकरण करतील, अशी आशा आहे. पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील काही नागरी सहकारी सोसायट्यांनी बिनपाण्याने धूळवड साजरी करण्याचा निर्धार केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील ‘जयमनीषा’ सोसायटीचे सचिव गणपत सावंत यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून आमच्या सोसायटीत विविध सण-उत्सव एकत्र साजरे केले जातात. त्यात होळीसुद्धा साजरी करतो. धूळवड हा तर सर्वांच्या आवडीचा व आनंदाचा सण आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई पाहता आमच्या सोसायटीतील रहिवासी धुळवडीत पाण्याचा वापर करणार नाही. केवळ रंग एकमेकांना लावून आम्ही सण साजरा करणार आहोत. बुधवारी होळीपूजनाचा कार्यक्रम होईल, पण धुळवडीला पाण्याचा वापर करायचा नाही, असा ठरावच सोसायटीच्या बैठकीत आम्ही केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील तुलसी साई विहार सोसायटीचे अध्यक्ष अनिल भोईर यांनी सांगितले की, इमारतीत पाण्याचा साठा बऱ्यापैकी आहे. बोअरवेलचे पाणी आम्ही इतर कामांसाठी वापरतो. इमारतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. इमारतीच्या नळाला अर्धा तास पाणी येते. पाण्याचे नियोजन आमच्याकडे असले तरी आम्ही पाण्याचा जपून वापर करीत आहोत. पाणी असले तरीही यंदा आम्ही धुळवडीला पाण्याचा वापर करणार नाही. थोड्या प्रमाणात रंगाचा वापर करून उत्सव साजरा केला जाणार आहे. टाटा पॉवर लाइनजवळील जयसाई सागर इमारतीचे सरचिटणीस शिवशंकर प्रजापती यांनी सांगितले की, आमच्या इमारतीत नळाला दोन ते तीन दिवसांनी पाणी येते. इमारतीतील रहिवाशांना पाण्यासाठी १८०० रुपये खर्च करून टँकर मागवावा लागतो. घरकामासाठी इतर ठिकाणांहून पाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत धुळवडीकरिता पाण्याचा वापर कसा करणार. त्यामुळे आमच्या सोसायटीत यंदा रंग खेळणार नाही. केवळ रंगाचा टिळा कपाळावर लावून सण साजरा केला जाणार आहे. कल्याण पूर्वेकडील देशमुख होम्सचे अमरसेन चव्हाण यांनी सांगितले की, त्यांच्या सोसायटीत एक हजार नागरिकांची वस्ती आहे. १७ फेब्रुवारीपासून सोसायटीच्या नळाला पाणीच आलेले नाही. सोसायटी मोठी असल्याने कोट्यवधींची पाणीबिले आम्हाला पाठवली गेली आहेत. बिले येतात, पाणी मात्र येत नाही. त्यामुळे यंदा धुळवडीला पाणी आणि रंग खेळायचे नाहीत, हे ठरले आहे.