शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नेत्यांचे कार्यकर्त्यांसह ढाब्यावर सहभोजन

By admin | Updated: February 23, 2017 05:55 IST

महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेनंतर शिवसेना, भाजपा, साईसह इतर पक्षांच्या नेत्यांनी रात्री

सदानंद नाईक / उल्हासनगरमहापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेनंतर शिवसेना, भाजपा, साईसह इतर पक्षांच्या नेत्यांनी रात्री कार्यकर्त्यांसह ढाब्यावर सहभोजनाचा आनंद लुटला. तसेच प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निकालाचा अंदाज घेतला. अनेक जणांनी मोबाइल सहकाऱ्यांकडे ठेवून बोलणे टाळले. काही नेत्यांनी बुधवारी सकाळी मंदिरात जाऊन देवाकडे विजयाचे साकडे घातले.उल्हासनगरात शिवसेनेचे प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. गेल्या एका महिन्याच्या धावपळीने थकवा जाणवला होता. तरीही, त्यांनी मतदान प्रक्रिया संपताच पक्ष पदाधिकारी व शिवसैनिकांसह सहभोजनाचा लाभ उठवला. नेहमीप्रमाणे मंदिरात जाऊन देवाकडे शिवसेनेची सत्ता येऊ दे. असे साकडे घातले. तसेच नातेवाइकांना फोन करून त्यांची विचारपूस केल्याचे ते म्हणाले. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी मतदान प्रक्रिया संपताच प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर, कार्यकर्त्यांसह भोजन घेऊन उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, पुन्हा निकालाबाबत कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मात्र, बुधवारी कुठेही धावपळ व फोनाफोनी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनी टीमच्या सर्व उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांसोबत मतदान प्रक्रियेनंतर चर्चा केली. तसेच त्यांचे म्हणणे ऐकल्यावर कलानी-महालवर सोबत जेवण घेतले. उशिरा उठल्यानंतर वडील पप्पू कलानी यांच्याशी बोललो. पुन्हा कलानीराज येणार असल्याचे ते म्हणाले. साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी मतदान प्रक्रियेनंतर उमेदवार व पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन घरी विश्रांती घेतली. सकाळी कार्यालयात जाऊन मतदान व निकालाचा कल कसा असू शकतो, याबाबत चर्चा केली. मात्र, बाहेर जाणे टाळले. तसेच परदेशी असलेल्या मुलीशी गप्पा मारून नातवाशी बोललो. कधी नव्हे आज शांत वाटत असून निकालाची चिंता नाही. सत्तेची चावी साई पक्षाकडे राहील, असे ते म्हणाले.